rashifal-2026

वसंत मोरेंना पुणे शहराध्यक्ष पदावरून हटवले

Webdunia
गुरूवार, 7 एप्रिल 2022 (15:31 IST)
पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील  सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मशिदीवरील भोंग्याविषयी वक्तव्य केले होते. त्यानंतर मनसेतील कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी यांच्यामध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे.
 
मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांबाबत मांडलेल्या भूमिकेनंतर, पक्षाचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी घेतलेली वेगळी भूमिका आणि विविध पदाधिकाऱ्यांचे राजीनामे अशा वेगवान घडामोडी सध्या घडत आहेत. त्यात वसंत मोरेंवर राज ठाकरे नाराज असल्याची चर्चा जोरात सुरू असून, त्यांना पदावरून हटवले आहे. 
 
राज ठाकरे यांच्या आदेशानं नगरसेवक साईनाथ बाबर यांची पुणे शहराध्यपदी निवड करण्यात आली आहे. साईनाथ बाबर हे कोंढवा संघातून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत.
 
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदींवरील अनधिकृत भोंग्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. यावर मनसेमधील मुस्लीम समाजातील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पुणे आणि इतर भागांत काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. 
 
वसंत मोरे यांच्या मतदार संघात मुस्लिम मतांची संख्या जास्त आहे. कात्रज प्रभागात मुस्लिमांची 3 हजार 800 मतं आहेत त्यामुळे राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे वसंत मोरे याना अडचण निर्माण झाली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

युरोप चुकीच्या दिशेने जात असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान

राज्यात पुढील 48 तास राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार, अलर्ट जारी

हिवाळी अधिवेशनात साताऱ्यातील फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येचा मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली

LIVE: राज्यात पुढील 48 तास राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार

डॉ. बाबा आढाव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार राज्य शासनाचा निर्णय

पुढील लेख
Show comments