suvichar

१० वीचा निकाल, राज्यात ३३ शाळांचा निकाल शून्य टक्के

Webdunia
शुक्रवार, 8 जून 2018 (17:27 IST)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या १० वी परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील ९ विभागीय परीक्षा मंडळातील २१,९५७ शाळांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. राज्यातील ४०२८ शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. तर ३३ शाळांचे निकाल चक्क शून्य टक्के लागला आहेत.
पुणे विभागातील ३ शाळा, नागपूर विभागातील ४ शाळा, संभाजीनगर विभागातील ९ शाळा, मुंबई विभागातील ५ शाळा, अमरावती विभागातील २ शाळा, नाशिक विभागातील ४ शाळा, लातूर विभागातील ६ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. कोकण आणि कोल्हापूर विभागातील एकाही शाळेचा निकाल शून्य टक्के लागलेला नाही.

 
पुणे विभागातील ७६० शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. नागपूर विभागातील ३४५ शाळांचा, संभाजीनगर विभागातील ३३५ शाळांचा, मुंबई विभागातील ८१६ शाळांचा, कोल्हापूर विभागातील ६८१ शाळांचा, अमरावती विभागातील २९७ शाळांचा, नाशिक विभागातील ३६८ शाळांचा, लातूर विभागातील १७७ शाळांचा, कोकण विभागातील २४९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments