Dharma Sangrah

हनुमानाचे जन्मस्थान अंजनेरी वाचवा, निसर्ग वाचवा मोहीम सुरू

Webdunia
गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (17:10 IST)
नाशिकमध्ये भगवान हनुमानाचे जन्मस्थान असलेल्या अंजनेरी येथे राखीव वन संवर्धन अंतर्गत सुरु झालेल्या ‘अंजनेरी वाचवा’ अभियान सुरु करण्यात आले आहे. शहरातील निसर्गप्रेमी, गिर्यारोहक यांनी मोठ्या प्रमाणावर यात सहभागी झाले आहेत. अभियानांतर्गत ४८ तासात १० हजार पेक्षा जास्त निसर्गप्रेमींनी ऑनलाईन विरोध नोंदवला आहे. अंजनेरी येथील जैवविविधतेचा ऱ्हास होऊ नये यासाठी नाशिककर एकत्र आहे आहेत. फेसबुक तसेच संबंधित सोशल मीडियावर या बाबत जनजागृती केली जात आहे. १४ किलोमीटरचा रस्ता झाल्यास मोठ्या प्रमाणात दुर्मिळ वनस्पती नामशेष होण्याच्या काळजीने सोशल मीडियावर या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.
 
महाराष्ट्रातील विविध शहरांमधून ४८ तासांत १० हजार पेक्षा जास्त अंजनेरी प्रेमींनी या निर्णयाला ऑनलाईन विरोध दर्शवला आहे. शासनाच्या या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी नेटीझन्सने डिजिटल अर्जावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. शहरातील निरनिराळ्या निसर्गप्रेमी संस्थांनी या मोहिमेस पाठिंबा दर्शवला आहे. संस्थांच्या माध्यमातून देखील सोशल मीडियावर जनजागृती केली जात आहे. मुळेगावातून थेट माथ्यापर्यंत १४ किलोमीटरचा रस्ता नेण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने वनविभागाला पाठवला आहे. या रस्त्याचा उद्देश पर्यटनविकास असा सांगितला जात असला तरी यातून होणाऱ्या वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे जैवविविधतेला हानी पोहोचू शकते अशी भूमिका निसर्गप्रेमींनी घेतली आहे. स्फोटकांचा वापर केल्यास दुर्मिळ प्रजाती नष्ट होण्याची शक्यता निसर्गप्रेमींनी वर्तवली आहे. मोहिमेत सहभागी होण्यासाठी http://bit.ly/save_anjaneri_wa येथे नोंदणी करा.
 
अंजनेरी हा नाशिक - त्र्यंबकेश्वर रांगेतील महत्त्वाचा किल्ला आहे. नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे. अंजनेरी गावात गेल्यावर पायऱ्यांच्या वाटेने गडावर जाता येते. मुळेगावच्या वाटेनेही गडावर जाता येते. गडावरून बुधली नावाची अवघड वाटही खाली उतरते.
 
इतिहास
अंजनेरी  किल्ला जनमानसात परिचित आहे तो हनुमान-जन्मस्थानामुळे. पवनपुत्र हनुमानाचा जन्म या डोंगरावर अंजनी मातेच्या पोटी झाला, असे मानले जाते. म्हणूनच या किल्ल्याला 'अंजनेरी' नाव देण्यात आले. याच डोंगराच्या परिसरात हनुमान लहानाचे मोठे झाले असे समजले जाते. येथे १०८ जैन लेणी आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील बीएमसीसह २९ महानगरपालिका संस्थांसाठी आज मतदान सुरू

BMC Elections बीएमसी निवडणूक ठाकरे ब्रँडसाठी एक मोठी परीक्षा

मतदानापूर्वी नागपुरात गोंधळ, पालकमंत्री बावनकुळे यांच्या गाडीला घेरले; पोलिस तैनात

Indian Army Day 2026 : भारतीय लष्कर दिन

नवीन पीएडीयू मशीन्सवरून विरोधक सतर्क, राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल

पुढील लेख
Show comments