rashifal-2026

देशमुखांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला : फडणवीस

Webdunia
मंगळवार, 23 मार्च 2021 (16:16 IST)
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप खोडून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत परमबीर यांच्या आरोपात तथ्य नाही. अनिल देशमुख १५ ते २७ फेब्रुवारी या दरम्यान होम क्वारंटाईन होते, असं शरद पवार म्हणाले होते. हे दावे खोडून काढण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेत कागदपत्र सादर केली. यात त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख हे खासगी विमानाने १५ फेब्रुवारीला मुंबईत आले होते, असा दावा केला आहे. देशमुखांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलाय, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
 
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत काही कागदपत्रे सादर केली. यात त्यांनी पोलीसांची दैनंदिन माहितीपत्र सादर केलं. यात कोणते मंत्री कधी आणि कुठे जाणार आहेत, याची माहिती त्यात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी १७ फेब्रुवारी २०२१ ची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यात १७ फेब्रुवारी २०२१ ला ३ वाजता अनिल देशमुख सह्याद्रीवर येतील आणि जातील अशी माहिती देण्यात आली आहे. तसंच २४ फेब्रुवारीची देखील माहिती दिली आहे. अनिल देशमुख ११ वाजता मोटारीने निवास स्थान ते मंत्रालय आणि मंत्रालय ते निवासस्थान असे जातील, अशी माहिती देण्यात आली आहे. पण गृहमंत्री गेले की नाही माहित नाही, असं फडणवीस म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

Goa fire जिल्हा प्रशासनाने उत्तर गोव्यात नाईटक्लब आणि हॉटेल्समध्ये फटाके वाजवण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी केला

नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान कोण होणार? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी अखेर खुलासा केला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून मणिपूरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर

LIVE: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! खात्यात ३००० रुपये येणार

ब्रह्मपुत्र नदीत पोहण्यासाठी गेलेल्या आठ जणांपैकी पाच जण बेपत्ता

पुढील लेख
Show comments