Festival Posters

देशमुखांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला : फडणवीस

Webdunia
मंगळवार, 23 मार्च 2021 (16:16 IST)
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप खोडून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत परमबीर यांच्या आरोपात तथ्य नाही. अनिल देशमुख १५ ते २७ फेब्रुवारी या दरम्यान होम क्वारंटाईन होते, असं शरद पवार म्हणाले होते. हे दावे खोडून काढण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेत कागदपत्र सादर केली. यात त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख हे खासगी विमानाने १५ फेब्रुवारीला मुंबईत आले होते, असा दावा केला आहे. देशमुखांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलाय, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
 
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत काही कागदपत्रे सादर केली. यात त्यांनी पोलीसांची दैनंदिन माहितीपत्र सादर केलं. यात कोणते मंत्री कधी आणि कुठे जाणार आहेत, याची माहिती त्यात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी १७ फेब्रुवारी २०२१ ची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यात १७ फेब्रुवारी २०२१ ला ३ वाजता अनिल देशमुख सह्याद्रीवर येतील आणि जातील अशी माहिती देण्यात आली आहे. तसंच २४ फेब्रुवारीची देखील माहिती दिली आहे. अनिल देशमुख ११ वाजता मोटारीने निवास स्थान ते मंत्रालय आणि मंत्रालय ते निवासस्थान असे जातील, अशी माहिती देण्यात आली आहे. पण गृहमंत्री गेले की नाही माहित नाही, असं फडणवीस म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: वाशिमचे माजी शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेश मापारी यांचा भाजपमध्ये प्रवेश

विदर्भात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, वाशिमचे माजी शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेश मापारी यांचा भाजपमध्ये प्रवेश

नांदेडमध्ये ४३ लाखांहून अधिक किमतीची ४,७९६ घातक शस्त्रे जप्त

पाकिस्तानमधील क्वेट्टा येथे रेल्वे रुळाजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यात २६ जण ठार

IPL 2026: प्लेऑफसाठी पात्र ठरणारा चौथा संघ आज निश्चित होणार; मुंबईचा सामना राजस्थानशी, तर केकेआरचा सामना दिल्लीशी होणार

पुढील लेख
Show comments