Marathi Biodata Maker

अजित पवार यांच्या संपर्कात भाजप कधीही नव्हती; पवार यांचा राजीनामा ‘स्क्रिप्टेड’- चंद्रशेखर बावनकुळे

Webdunia
मंगळवार, 9 मे 2023 (07:35 IST)
भाजपने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी कधीही संपर्क साधला नाही तसेच अशा प्रकारच्या अफवा काही लोकांकडून पसरवल्या जात असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. खरेतर, अजित पवारांना महाविकास आघाडीतील (MVA), शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस यांच्याकडून लक्ष केले जात असल्याचा दावाही भाजप प्रदेशाध्यक्षांनी केला.
 
भाजपच्या बैठकीच्या निमित्ताने पुण्यात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय आणि त्यानंतरचा यू- टर्न म्हणजे नाटक असल्याचा दावा करून राजीनाम्याचा संपूर्ण भाग ‘स्क्रिप्टेड’ असल्याचे सांगितले.
 
यावेळी बोलताना ते म्हणाले, “गेल्या चार महिन्यांपासून मी आणि अजित पवार दोघेही एकमेकांच्या संपर्कात नाही. खरे तर अजित पवारांना महाविकास आघाडीकडूनच टार्गेट केले जाते. आम्ही अजितदादांशी कधीही कसलाही संपर्क साधला नाही. काही अफवाही पसरवल्या जात आहेत” असेही ते म्हणाले.
 
पुढे बोलताना ते म्हणाले, “माझा ठाम विश्वास आहे की काही लोकांमध्ये मतभेद असले तरी प्रश्न हा आहे की रयत शिक्षण संस्थेसह अनेक सहकारी संस्थांचे अध्यक्ष बनलेले शरद पवार संस्थांच्या घटनेत फेरफार करून कोणालाही अध्यक्ष कसे होऊ देतील?” असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्षांनी केला.
Edited by : Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

भाजपने निवडणुकीत धार्मिक राजकारण आणि दुटप्पीपणाचा अवलंब केला; मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आरोप केला

LIVE: मुंबईतील मतदार धार्मिक राजकारण नाकारतील काँग्रेसचा दावा

मुंबई-नाशिक महामार्गावर हिट अँड रन; डोंबिवलीतील जोडप्याचा दुर्दैवी मृत्यू

Flashback : २०२५ मध्ये या भारतीय खेळाडूंनी क्रिकेटला निरोप दिला

T20 World Cup विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा

पुढील लेख
Show comments