rashifal-2026

सी.एम. आले पुढे, पीएमसी बँकेच्या प्रकरणी कोणाचेही नुकसान होऊ देणार नाही - देवेंद्र फडणवीस

Webdunia
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019 (10:21 IST)
ठाणे जिल्ह्यात महायुतीच्या जाहीर सभेसाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सभा झाल्यानंतर पीएमसी बँकेच्या खातेदारांनी घेराव केला होता, त्भायावेळी भावुक झालेल्या खातेदारांनी प्रश्न विचारला की, 'आमचे पैसे मिळणार का नाही?, तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले की 'कोणाचेही नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

फडणवीस पुढे म्हणाले की 'आता निवडणूक असल्याने सध्या काहीही करता येणार नाही, मात्र ज्या दिवशी निवडणूक संपेल, त्याच्या दुसऱ्या दिवशी या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालणार असून, यासंदर्भात निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी खातेदारांना सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांचा आश्वासनानंतर काही प्रमाणात खातेदारांना दिलासा मिळाला. देशात आणि राज्यात पीएमसी बँक बुडाली त्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर घातलेल्या निर्बंधानंतर सर्वच खातेदार बेहाल झाले असून, ठाण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांनाच खातेदारांचा सामना करावा लागला आहे. मुख्यमंत्र्यांचे जाहीर भाषण झाल्यानंतर काही खातेदारांनी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाच्या आतमध्ये पीएमसी बँकेच्या विरोधात पोस्टरबाजी केली तसेच बँकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री भाषण संपवून निघत असतानाच खातेदारांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुख्यमंत्री या सर्व खातेदारांचे म्हणणे एकूण घेण्यासाठी स्वतः खातेदारांकडे गेले. त्यानंतर त्यांनी स्वतः सर्व खातेदारांचे म्हणणे एकूण घेतले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

एफआयआरमध्ये नाव नसणे म्हणजे क्लीन चिट नाही, पार्थ जमीन घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

शिवसेनेचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार!आदित्य ठाकरेंच्या दाव्याने गोंधळ

इंडिगो संकट जाणूनबुजून घडवले गेले होते का? सरकारने नोटीस बजावली, चौकशी सुरू

LIVE: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

वन्यजीवांसाठी अनंत अंबानी यांना जागतिक मानवतावादी पुरस्कार, वंताराला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली

पुढील लेख
Show comments