Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू

raj thackeray
, मंगळवार, 26 एप्रिल 2022 (10:10 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेपूर्वीच औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. औरंगाबादेत आजपासून 9 मे पर्यंत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यामुळेनिदर्शने, धरणे मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई आदेश लागू झाले आहेत. त्यामुळे 1 मे रोजीच्या राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार का याची मोठी उत्सुकता आहे.
 
 पोलीस आयुक्त निखिल गुप्ता  यांनी जामावबंदीचे आदेश देत 5 पेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास, निदर्शने, धरणे मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई आदेश काढला आहे. तसेच मनसे प्रमुख राज ठाकरेयांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी सुद्धा सुरु आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

3 मुलींची धावत्या ट्रेन मधून उडी,व्हिडीओ व्हायरल !