Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'वायू' वादळ: मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये

Webdunia
वायू चक्रीवादळ जलदगतीने गुजरातच्या दिशेने पुढे सरकत असून गुजरात राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी हवेच्या दाबामुळे वायू चक्रीवादळाचा धोका पश्चिम किनाऱ्यावरील शहरांना बसणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 13 जून रोजी पोरबंदर आणि कच्छ येथे वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. येथून 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
 
तसेच महाराष्ट्रात याचं संकट टळलं असलं तरी मुंबईत परिणाम जावणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये आणि झाडांखाली उभं राहू नये असा सल्ला देण्यात येत आहे. मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असून अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. 
 
वायू चक्रीवादळ मुंबईच्या दक्षिण किनारपट्टीपासून 280 किमी अंतरावर धडकलं आहे. हे वादळ 110-135 किमी प्रतिवेगाने गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. तरी या वादळामुळे महाराष्ट्रातील उत्तर समुद्रकिनारी सोसाट्याचा वारा वाहणार असून प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. 
 
समुद्रकिनारी जाणे टाळावे तसेच मच्छिमारांनीही समुद्रात प्रवेश करु नये अशा इशारा देण्यात आला आहे. या प्रभावामुळेच शहारत अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडण्याची शकतात असल्यामुळे मुंबईकरांनी झाडांपासून लांब राहावे असा सल्ला दिला गेला.
 
वायू चक्रीवादळ 110-135 किमी प्रतिवेगाने गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. वायू चक्रीवादळाचा प्रभाव गुजरातमधील कच्छ, देवभूमी, द्वारका, पोरबंदर, राजकोट, जूनागड, सह अनेक जागी दिसून येण्याची शक्यता आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

LIVE: बुलढाण्यात भीषण रस्ता अपघात

बुलढाण्यात भीषण अपघात, बस आणि ट्रकच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू

संभाजी भिडे गुरुजींवर हल्ला

World Art Day 2025 : जागतिक कला दिन

बंद कारमध्ये अडकून गुदमरल्याने दोन लहान मुलींचा मृत्यू

पुढील लेख
Show comments