Marathi Biodata Maker

काँग्रेसचा इंदू मिलच्या जागेवर डोळा होता त्यामुळे ते कधीच स्मारकाचे काम पूर्ण केले नाही - मुख्यमंत्री

Webdunia
सोमवार, 21 जानेवारी 2019 (09:41 IST)
भाजपाने अनुसूचित जातीसाठी मोठे काम केले असून काँग्रेसने फक्त त्यांचा ‘व्होटबँक’ म्हणून वापर केल्याची टीका त्यांनी केली. भाजपा सरकारमुळे इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होत असून २०२० ला हे स्मारक पूर्ण होईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. काँग्रेसचा इंदू मिलच्या जागेवर डोळा होता. त्यामुळेच केंद्रात व राज्यात काँग्रेसचे सरकार असतानाही स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळू शकली नाही. नागपूर येथील भाजपाच्या विजय संकल्प सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या आई-बापांचे स्मारक उभा केले. पण त्यांनी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जागा दिली नाही. काँग्रेसने अनूसूचित जातीचा फक्त वापरच केला, असा आरोप त्यांनी केला.
 
फडणवीस यांनी यावेळी विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या महाआघाडीलाही लक्ष्य केले. हे सर्व पक्ष परिवाराचे पक्ष आहेत. त्यांना फक्त सत्ता हवी आहे.असे फडणवीस यांनी मत यक्त केले.मोदींमुळे बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक पूर्ण होत असल्याचे ते म्हणाले. इंदू मिल प्रश्नी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर त्यांनी वस्त्रोद्योग मंत्र्यांनी तीन दिवसांत जागा देण्याचे आदेश दिले. निधीही मोठ्याप्रमाणात दिला. २०२० पर्यंत इंदू मिल येथे बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे राहील. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

सर्व पहा

नवीन

कोण आहेत महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी? त्यांच्या संपत्ती आणि राजकीय प्रवासाबद्दल जाणून घ्या

RSS च्या व्यासपीठावर सलमान खान, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विरोधकांना चोख उत्तर देताना म्हटले, "तो भारतीय आहे, त्यात काय चूक आहे?"

थायलंडच्या शाळेत भयानक हत्याकांड, २२ निष्पाप मुलांसह ३४ जणांचा मृत्यू, मुलांना ओलीस ठेवण्यात आले

अमेरिकेने आम्हाला टॉयलेट पेपरसारखे वापरले, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचे संसदेत मोठे विधान

LIVE: मुख्यमंत्री फडणवीस यांनी बॉलीवूड कलाकारांना असलेल्या धमक्यांबाबत मोठी घोषणा केली

पुढील लेख
Show comments