Festival Posters

पडद्यामागे 'अर्थ'पूर्ण बाबी घडल्या का? - धनंजय मुंडे

Webdunia
सोमवार, 13 ऑगस्ट 2018 (09:26 IST)
मल्टिप्लेक्समधील बाहेरील खाद्यपदार्थांबाबत सरकारचा 'यू टर्न' गूढ आणि चमत्कारिक;

राज्यातील मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्याबाबत सरकारने न्यायालयात घेतलेला यू टर्नचा निर्णय गूढ आणि चमत्कारिक असून या प्रकरणी पडद्यामागे काही अर्थपूर्ण बाबी घडल्या आहेत का, असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी उपस्थित केला आहे.
 
नागपूर येथे झालेल्या अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मुभा असावी याबाबत लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी सरकारने मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास अशी कुठलीही बंदी नाही, अशी बंदी कोणी करत असेल तर कारवाई करू तसेच १ ऑगस्टपासून खाद्यपदार्थांच्या किमतीची एकच एम.आर.पी. राहिल अशी भूमिका घेतली होती.
 
मात्र या भूमिकेवरून अचानक यू टर्न घेत सरकारने दोन दिवसांपूर्वी न्यायालयात सुरक्षिततेच्या कारणावरून मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास बंदीची भूमिका योग्य असल्याची भूमिका मांडली होती. सरकारच्या या भूमिकेवर धनंजय मुंडे यांनी एका ट्विटद्वारे संशय व्यक्त केला असून सरकारने न्यायालयात घेतलेली यू टर्नची भूमिका गूढ आणि चमत्कारिक आहे. या पडद्यामागे काही अर्थपूर्ण बाबी घडल्या असाव्यात असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. विमानासारख्या सर्वोच्च सुरक्षा असणार्‍या ठिकाणीही बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास बंदी नसताना मल्टिप्लेक्समध्ये अशी बंदी घालून सरकार मल्टिप्लेक्स चालकांना राज्यातील लाखो प्रेक्षकांची लूट करण्याचा उघड परवाना देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

“आर्थिक वर्ष २०२५-२६'' दरम्यान जागतिक आव्हानांना सामोरे जावे लागले; पण भारताने आपली आर्थिक गती कायम राखली आणि या काळात रिलायन्सची वाढही सुरू राहिली-मुकेश डी. अंबानी

LIVE: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जबाबदाऱ्यांची विभागणी

रिलायन्स रिटेल एआय (AI) आणि किमतींवर लक्ष केंद्रित करणार, मोठ्या प्रमाणाचे मूल्यात रूपांतर करणार-ईशा अंबानी

जिओ एआय युगाचे डिजिटल प्रवेशद्वार बनेल-आकाश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२५-२६ आणि चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले

पुढील लेख
Show comments