Festival Posters

धनंजय मुंडे यांचे म्हणणे आहे की “त्या’ शिवसेना नगरसेवकांना अटक करा

Webdunia
सोमवार, 4 मार्च 2019 (08:16 IST)
नवी मुंबईत उद्‌घाटन सोहळ्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात झालेल्या वाद विकोपाला गेला आहे. या राड्यात राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक गाडीतून जात असताना त्यांच्या गाडीवर लोखंडी रॉड, कैचीने हल्ला केला होता. या प्रकरणी दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात आल्याने विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार संदीप नाईक यांनी पोलीस आयुक्त संजय कुमार यांची भेट घेत शिवसेना नगरसेवकांना अटक करण्याची मागणी केली.
 
पोलिसांनी सत्ताधारी शिवसेनेच्या दबावाखाली येत शहरातील वातावरण खराब करणाऱ्यांना पाठिंबा दिला असून पोलीस त्यांचे हुजरे झाल्याचा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. हा हल्ला शिवसेना नगरसेवक करण मढवी यांनी आपल्या कार्यकर्त्यांकरवी केला असल्याचा गंभीर आरोप संदीप नाईक यांनी केला आहे. रबाले पोलीस ठाण्यात शनिवारी शिवसेना नगरसेवक एम के मढवी, नगरसेवक करण मढवी, नगरसेविका विनया मढवी, इतर तीन जणांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र हे गुन्हे मागे घेण्यात आल्याने विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार संदीप नाईक यांनी पोलीस आयुक्त संजय कुमार यांची भेट घेत शिवसेना नगरसेवकांना अटक करण्याची मागणी केली.
 
आमदारांच्या गाडीवर हत्याराने हल्ला होवूनही जर पोलीस आयुक्त आरोपींना पाठीशी घालत असतील तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी आंदोलन करणार असल्याचा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

बांगलादेशात हिंदू व्यक्तीवर धारदार शस्त्रांनी हल्ला, नंतर पेट्रोल ओतून जाळून टाकले

हे काय ! शिवसेनेच्या उमेदवाराने स्वतःच्याच नेत्याचा एबी फॉर्म फाडून गिळला

चालत्या व्हॅनमध्ये क्रूरता, नंतर पीडितेला रस्त्यावर फेकून दिले; या प्रकरणाने देशाला हादरवून टाकले

आदित्य ठाकरेंच्या कोअर टीमला मोठा धक्का: शीतल देवरुखकर-शेठ उद्धव ठाकरेंच्या पक्षातून बाहेर पडून भाजपमध्ये सामील

बीएमसी निवडणुकीत मतविभाजनाची भीती संपली ? ३२ जागांवर 'तिसरी आघाडी' नसेल, दोन आघाड्या आमनेसामने येतील

पुढील लेख
Show comments