Marathi Biodata Maker

मासे झाले महाग, खवय्ये नाराज, भाव गगनाला भिडले

Webdunia
शुक्रवार, 22 जून 2018 (16:06 IST)
पावसाला सुरु झाला आणि मासे पकडणे अवघड झाले आहे. त्यात समुद्रात वादळ असल्याने पुढील अनेक महिने मत्स्यबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये सध्या मासे खाणाऱ्या खवय्यांची कोंडी दिसून येते आहे. मात्र बंदी नंतर ही जे मासे सहज मिळतात, त्याचाही जोरदार  तुटवडा आहे. त्यामुळे माशांचे भाव प्रचंड वाढले आहेत. पावसाळ्यात जून महिन्यापासून नारळी पौर्णिमेपर्यंत समुद्रात मासेमारी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या 3 महिन्यात बाजारात मासे फारच कमी प्रमाणात असतात. त्यात सर्वाधिक बोंबील, मांदेली असे मुंबई आणि आसपासच्या समुद्रात हमखास सापडले जातात. त्यामुळे आधी पकडलेले, बर्फात ठेवलेले मासेच सध्या विक्रीसाठी आहेत. परिणामी त्यांची किंमत प्रचंड वाढली आहे. 20 ते 30 रुपयांची मासळीदेखील शंभरच्याघरात विकली जात आहे.तर त्यातही चूक माणसांची आहे. खारफुटी नष्ट केल्याने  यांत्रिक मासेमारी आणि समुद्रातील प्रदूषण याचा थेट परिणाम माशाच्या प्रजननावर होत आहे. त्यामुळे समुद्रात पावसाळ्यात मिळणारे बोंबील, मांदेलीसारखे मासेदेखील कमी मिळत आहेत. ही धोक्याची घंटा आहे हे असेच सुरु राहिले तर येत्या काही वर्षात हे मासे मिळणे बंद होईल.
 
यामध्ये मांदेली वाटा प्रमाणे पूर्वी 20 रु. मिळत होती आता ती 90 ते 100 रुपये मिळते आहे. बोंबील एक वाटा 30-40 रु असे आता 100 ते 120 रुपये मिळत आहे. सूरमई (1 नग) 100-150 मिळत असे आता 250 ते 300 रुपये मिळते आहे. तर मोठी कोंळबी किलो 200 रु होती आटत 250 रु झाली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

सर्व पहा

नवीन

विद्येच्या मंदिरातच वासनेचा नंगानाच! लोहारातील सरकारी शाळेत शिक्षकांकडून २४ विद्यार्थिनींचा विनयभंग

नातं काळवंडलं! जावयासोबत पळालेल्या सासूचा आता मेहुण्यावर जीव जडला; १० महिन्यांत दोनदा पळाली

Bharat Bandh आज देशभरात शेतकऱ्यांचा संप, बँकांपासून शाळा आणि महाविद्यालयांपर्यंत... काय सुरू राहील आणि काय बंद राहील?

LIVE: पुण्यात बंगाली बोलल्यामुळे तरुणाची हत्या; ममता बॅनर्जी आक्रमक, राज्य सरकारला दिला इशारा

पुण्यात बंगाली बोलल्यामुळे तरुणाची हत्या; ममता बॅनर्जी आक्रमक, राज्य सरकारला दिला इशारा

पुढील लेख
Show comments