Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मासे झाले महाग, खवय्ये नाराज, भाव गगनाला भिडले

Webdunia
शुक्रवार, 22 जून 2018 (16:06 IST)
पावसाला सुरु झाला आणि मासे पकडणे अवघड झाले आहे. त्यात समुद्रात वादळ असल्याने पुढील अनेक महिने मत्स्यबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये सध्या मासे खाणाऱ्या खवय्यांची कोंडी दिसून येते आहे. मात्र बंदी नंतर ही जे मासे सहज मिळतात, त्याचाही जोरदार  तुटवडा आहे. त्यामुळे माशांचे भाव प्रचंड वाढले आहेत. पावसाळ्यात जून महिन्यापासून नारळी पौर्णिमेपर्यंत समुद्रात मासेमारी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या 3 महिन्यात बाजारात मासे फारच कमी प्रमाणात असतात. त्यात सर्वाधिक बोंबील, मांदेली असे मुंबई आणि आसपासच्या समुद्रात हमखास सापडले जातात. त्यामुळे आधी पकडलेले, बर्फात ठेवलेले मासेच सध्या विक्रीसाठी आहेत. परिणामी त्यांची किंमत प्रचंड वाढली आहे. 20 ते 30 रुपयांची मासळीदेखील शंभरच्याघरात विकली जात आहे.तर त्यातही चूक माणसांची आहे. खारफुटी नष्ट केल्याने  यांत्रिक मासेमारी आणि समुद्रातील प्रदूषण याचा थेट परिणाम माशाच्या प्रजननावर होत आहे. त्यामुळे समुद्रात पावसाळ्यात मिळणारे बोंबील, मांदेलीसारखे मासेदेखील कमी मिळत आहेत. ही धोक्याची घंटा आहे हे असेच सुरु राहिले तर येत्या काही वर्षात हे मासे मिळणे बंद होईल.
 
यामध्ये मांदेली वाटा प्रमाणे पूर्वी 20 रु. मिळत होती आता ती 90 ते 100 रुपये मिळते आहे. बोंबील एक वाटा 30-40 रु असे आता 100 ते 120 रुपये मिळत आहे. सूरमई (1 नग) 100-150 मिळत असे आता 250 ते 300 रुपये मिळते आहे. तर मोठी कोंळबी किलो 200 रु होती आटत 250 रु झाली आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments