Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साडेचार कोटी रुपयांचे सोने फेकले विहरीत

Webdunia
सोमवार, 25 सप्टेंबर 2017 (08:03 IST)
हो असा प्रकार समोर आला आहे नाशिक मध्ये. पिंपळगाव बसवंत येथे एका सोनाराच्या दुकानात चोरट्यांनी चोरी केली होती. मग चोरी केली आणि सोबत सीसीटीव्ही सुद्धा पळवले होते. मात्र कोणाला शंका येवू नये म्हणून एका शेतातील विहरीत पंधरा किलो सोने त्यांनी लपवण्यासाठी टाकून दिले होते. पोलिसांनी इकडे तपास सुरु केला, दुकानातील चोरी कशी झाले हे तपासले. नंतर त्यांनी याठिकाणी असलेल्या सर्व लोकांची तपासणी केली त्यात दुकानातील एक कर्मचारी अचानक सुट्टीवर गेला होता. पोलिसांनी तपास केला. आधीच पुरावे कमी त्यात चोरी झाले तेव्हाचे सर्व सीसी टीव्ही फुटेज चोर घेवून पळाले होते. मात्र पोलिसांनी अखेर छडा लावला आणि हे सर्व चोर पकडले गेले. त्यांनी हे साडेचार कोटी रुपयांचे सोने विहरीत फेकले होते. मग पोलिसांनी विहरीत उतरायला पाणबुड्या बोलवला आणि सर्व सोने बाहेर काढले आहे.

काय आहे प्रकरण :

पिपळगाव बसवंत येथील भरवस्तीतील सराफाच्या दुकानाचे कुलूप तोडून गुरुवारी (दि. २१) रात्रीअज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करीत दुकानातील तिजोरी बनावट चावीने उघडून सुमारे १५ किलो सोने चोरून नेले होते. हे सोने सुमारे किंमत सुमारे चार कोटी रुपये  आहे.  मुंबई - आग्रा महामार्गावर अशोक चोपडा यांचे श्रीनिवास ज्वेलर्स हे शोरूम आहे सदर दुकान हे दुमजली असूनवरील मजल्यावर मालक स्वत: राहतात.  गुरुवारी रात्री चोरट्यांनी दरवाजा तोडून दुकानात प्रवेश केला व लॉकर बनावट चावीने उघडले. त्यांनी लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने घेऊन गेला होता.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments