Dharma Sangrah

सोनेच उठले नागरिकाच्या जीवावर स्थानिकांना धोका

Webdunia
मंगळवार, 15 जानेवारी 2019 (17:36 IST)

उल्हासनगर शहरात असलेल्या सोनारगल्ली परिसरात जवळपास ३०० सोनरांची दुकाने असून यामध्ये सोन्याची चाचणी करण्यासाठी धोकादायक पद्धतीने अॅसिड वापर केला जातो. यामुळे स्थानिक रहिवाशांना धोका निर्माण झाल्याचा आरोप मनसे संघटक दिनेश आहुजा यांनी केला असून त्यांनी स्थानिक पोलीस ठाणे, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच महानगरपालिकेकडे तक्रार केली आहे. उल्हासनगर कॅम्प १ येथील सोनारगल्ली आहे. सोने खरेदी साठी ग्राहकांची जोरदार वर्दळ असते.सुमारे ३०० सोनारांची दुकाने आहेत. दुकानात सोनं विताळण्यासाठी ऍसिडचा वापर करतो. प्रत्येकाजवळ साधारण ३५ लिटर अॅसिडचा ड्रम आपल्याकडे ठेवत आहे. सोन्याच्या चाचणीनंतर अॅसिडचे हे पाणी नाल्यात सोडतात. त्यामुळे जर एखाद्या वेळेस आग अथवा अनुचित प्रकार घडला तर येथील अरुंद गल्लीतुन अग्निशमन दलाची गाडी सुद्धा पोहोचणार नाही. यासंदर्भात ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वलेचा यांना विचारले असता ते म्हणाले, की ”हा प्रकार धोकादायक आहे त्यामुळे हे काम नियोजित रित्या केले पाहिजे. काही सोनार भाड्याने घरे घेतात आणि त्यामध्ये सोने विताळण्याचे काम करतात. यासाठी व्यावसायिक गाळे बनवले पाहिजेत आणि सांडपाण्याची व्यवस्था देखील चांगल्या रीतीने झाली पाहिजे.” आता यादृष्टीने ठोस पावले कधी उचलण्यात येणार हे येणारी वेळच सांगेल. त्यामुळे आता सोनेच जर जीवावर उठणार असेल तर कारवाई झाली पाहिजे असे नागरिक म्हणत आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना लावला 'पूर्णविराम'; शशिकांत शिंदे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली

LIVE: पुण्यातील ७१० कोटी रुपयांचा कात्रज-कोंढवा रस्ते प्रकल्प भूसंपादनातील अडथळ्यांमुळे रखडला

'लाडकी बहीण योजना' बंद करा... मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला असे का म्हटले? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

राईड रद्द केल्यावरून गदारोळ: पुण्यात पाच जणांचा रॅपिडो चालकावर हल्ला; दगडांनी मारून केले जखमी

मुकुल चौधरी कोण आहे? ज्याने षटकारांचा वर्षाव करत कोलकाता विरुद्ध खेचून आणला विजय, सोशल मीडियावर नवा 'टायगर' म्हणून ट्रेंडिंग

पुढील लेख
Show comments