Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात जोरदार पाऊस, महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट

Webdunia
रविवार, 29 जानेवारी 2023 (12:33 IST)
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वादळामुळे राज्यात पावसाचं वातावरण तयार झाले आहे. परिणामी राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
 
विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे बळीराजा धास्तावला आहे. अशात आता राज्यात आज आणि उद्या थंडीचा जोर थोडा कमी होणार असून मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक औरंगाबाद जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवण्यात आली आहे. मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे किमान तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा कडाका वाढला आहे. 
 
राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सोसाट्याच्या वारासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातील 10 आणि मराठवाड्यातील ७ अशा १७ जिल्ह्यांमध्ये पावसाच्या तुरळक सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली. उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर पुणे, नगर, जालना, बीड जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी येतील.
 
ज्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तिथे थंडीचा प्रभाव कमी होणार असून मुंबई, कोकण आणि विदर्भात थंडी कायम राहणार आहे.
 
अवकाळी पावसाचा अंदाज असल्याने काही ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे. मात्र, 29जानेवारीनंतर पुन्हा तापमानात घट हऊन थंडीचा जोर राज्यभरात वाढण्याची शक्यता आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट कायम राहणार आहे. 
 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments