Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Weather Forecast : राज्यातील पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना यलो अलर्ट

Webdunia
शनिवार, 18 जून 2022 (13:23 IST)
गेल्या पंधरा दिवसांपासून मान्सून येणार अशी माहिती हवामान खात्यांकडून दिली आहे. मात्र अद्याप  महाराष्ट्रात मान्सून सक्रिय नाही. पाकिस्तानातून येणाऱ्या वाऱ्यामुळे मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवरच थांबला आहे. राज्यातील काही भागात येत्या 3  दिवसांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. येत्या 19  ते 21  जून या काळात राज्यातील 15  जिल्ह्याना यलो अलर्टचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यात विदर्भ आणि मध्यप्रदेश आणि गुजरात मध्ये मान्सून पोहोचल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. यंदा मान्सून येण्यास विलंब झाला आहे तरीही  राज्यातील काही भागात मान्सून सक्रिय झाला आहे तरी कमी दाबाचे पट्टे तयार होत नाही आणि ढग तयार होण्यास वेळ लागत आहे त्यामुळे पावसाचे आगमन होत नाही. येत्या 19 जून पासून पुढील 3 दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून राज्यात पालघर , ठाणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर , सातारा, अमरावती, अकोला, भंडारा, नागपूर , वर्धा , बुलडाणा, यवतमाळ, वर्धा आणि वाशीम या 15जिल्ह्यात 'यलो' अलर्ट सांगण्यात आले आहे. 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments