Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुसळधार पावसाचा कहर: पुराच्या पाण्यात वाहून गेली 60 जनावरे

Webdunia
मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (11:44 IST)
राज्यात पावसाने कहर केला आहे.राज्यातील अनेक भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात पावसाने थैमान मांडला आहे.पावसामुळे जनधनाचे नुकसान झाले असताना  यवतमाळच्या महागावातून  एक दुर्देवी घटना समोर आली आहे. इथे देखील पावसाचे संकट कायम आहे. काल झालेल्या पावसामुळे नाल्याला पूर आला आहे. सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. अशा परिस्थिती मध्ये शेतकऱ्यांवर संकटाचे सावट आहे. शेतकऱ्यांचे पिके देखील या पुरात वाहून गेली आहे.या गावात पुराच्या पाण्यात सुमारे 60 ते 70 जनावरे वाहून गेल्याचा हृदयद्रावक व्हिडीओ समोर आला आहे.

दोन दिवसाच्या विश्रांती नंतर पावसाने पुन्हा झडी लावली होती. त्यात पाऊस नसल्याने बेलदारी गावातून एक व्यक्ती आपल्या गाय गुरांना चारण्यासाठी घेऊन गेला.तेवढ्यात गावातील नाल्याला पूर आला.नाला ओलांडताना पुराला पाणी जास्त असल्यामुळे एकापाठोपाठ त्याची सर्व जनावरे वाहून गेली. काहींना वाचविण्यात यश आले आहे.मात्र या पुरात 60 ते 70 जनावरे वाहून गेली आहे. हा व्हिडीओ  एका गावकऱ्याने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या घटने मुळे शेतकऱ्याचे  खूप मोठे नुकसान झाले आहे.या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments