Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दारूच्या बाटल्या मंत्रालयांमध्ये कशा पोहचू शकतात : दरेकर

How bottles of liquor can reach ministries: Darekar Maharashtra News Regional News In Marathi Webdunia Marathi
Webdunia
मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (15:46 IST)
मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्याचे वृत्त समोर आल्याने, सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर, हा प्रकार समोर आल्यानंतर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आता महाविकासाआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, “महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणारी अशी घटना आज समोर आली आहे, असं म्हणत दरेकर यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी.अशी मागणी केली आहे.
 
“मंत्रालयामध्ये दारूच्या बाटल्या सापडणे अत्यंत दुर्दैवी, चीड आणणारी आणि शरम आणणारी अशी घटना आहे. राज्यामध्ये कोविड परिस्थिति बरोबर पूरग्रस्त परिस्थिति उभी आहे. एका बाजूला मंत्रालयामध्ये सर्वसामान्य लोकांना प्रवेश मिळणं आपल्या न्यायहक्कासाठी दुरापास्त असताना दारूच्या बाटल्या मंत्रालयांमध्ये कशा पोहचू शकतात?” असा सवाल दरेकरांना केला आहे.
 
“दारूच्या बाटल्या मंत्रालायामध्ये कोणी आणल्या आणि कशासाठी आणल्या? या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, संबंधितांवर कारवाई झालीचं पाहिजे.या प्रकरणावरून सरकारची मानसिकता,सरकारचा कारभार कोणासाठी,कशासाठी चालला आहे हे दिसून येत आहे.हे सरकार नेमकं कोणासाठी काम करत आहे. धनदांडग्यांसाठी करतंय,दारू विक्रेतयांसाठी करतंय, डान्स बार वाल्यांसाठी किंवा रेस्टोरंट वाल्यांसाठी काम करत आहे, की सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करतंय हे एकदा जनतेला कळलं पाहिजे.”असंही प्रवीण दरेकर यांनी बोलून दाखवलं आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

भारतात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले, लोकांमध्ये भीतीचे वातावरण

हिंगणा तालुक्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात ४ वर्षांच्या मुलीची मृत्यू

LIVE: शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले राज्यात सीबीएसई पॅटर्न २ टप्प्यात लागू करणार

पालघर मध्ये तरुणाने विषारी कार्बन मोनोऑक्साइड वायू श्वासाने घेऊन केली आत्महत्या

औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय स्मारक... वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

पुढील लेख
Show comments