Dharma Sangrah

उध्दव यांच्या क्षमतेबद्दल मला शंका : राणे

Webdunia
शनिवार, 21 डिसेंबर 2019 (15:07 IST)
मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विराचांशी बेईमानी केली, असा आरोप माजी मुख्यमंत्री व भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी केला. नव्या सरकारवर टीका करताना राणे यांनी ठाकरे यांचा एकदा एकेरी उल्लेख केला. तसेच त्यांच्या क्षमतेबद्दल मला शंका आहे, असेही ते म्हणाले.
 
शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे पहिलेच अधिवेशन नागपुरात सुरू आहे. त्यामुळे या अधिवेशनाबद्दल सर्वसामन्यांबरोबरच नेत्यांनाही प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दुसरच्या दिवशी नागपुरात दाखल झाले होते. त्यांच्या पाठोपाठ भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे तिथे पोहोचले होते. नारायण राणे हेही अधिवेशनस्थळी पोहोचले. 
 
तिथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केले. महाराष्ट्राच्या जनतेने युतीला कौल दिला होता. पण महाविकास आघाडीसत्तेवर आली. ही आघाडी सर्व तत्त्व व विचारधारांना मूठमाती देऊन झालेली आहे. बाळासाहेब असते तर अशी आघाडी झाली नसती, असे राणे म्हणाले. आम्ही आघाडीत गेलो म्हणजे धर्मांतर केले नाही, या ठाकरे यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. मी हिंदुत्ववादी आहे हे सोनिया गांधींना सांगा, असे राणे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस हा 'टॅक्स फ्री' पक्ष आहे. तो कुठेही जातो, असा टोला त्यांनी हाणला. 
 
महाराष्ट्रात धमक असणारा मुख्यमंत्री हवा. अन्यथा, महाराष्ट्र प्रगती करणार नाही. उध्दव, आदित्य व संजय राऊत हे पवारांकडे गेले आणि मुख्यमंत्रिपदासाठी उध्दव यांचे नाव जाहीर करणची गळ घातली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

अजित पवारांच्या उत्तराधिकाऱ्याच्या चर्चेवर संजय राऊत संतापले; म्हणाले-"राजकारण नाही तर मानवता महत्त्वाची

आसामचा चहा २७ देशांमध्ये शुल्कमुक्त निर्यात केला जाईल; दिब्रुगडमध्ये अमित शाह यांनी केल्या घोषणा

LIVE: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारख्यात बदल

सोनं-चांदीचा नवा रेकॉर्ड

लग्नाच्या दोन महिन्यांनंतर पत्नी प्रियकरासोबत पळून गेली, पती आणि मेहुण्यांनी आत्महत्या केली!

पुढील लेख
Show comments