Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Jamkhed : बहिणीला वाचवण्यासाठी गेलेल्या दोन भावांचा पाण्यात बुडून मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 (17:06 IST)
Jamkhed  : जामखेडच्या खर्डा येथे तीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. मयत मुले एकाच कुटुंबातील होती. या घटनेनं शोककळा पसरली आहे. कपडे धुण्यासाठी आईसह गेलेल्या तिन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. सदर घटना खर्ड्या पासून 3 किमी च्या अंतरावर शिर्डी- हैद्राबाद महामार्गावरील आंतरवली फाटाच्या पाझर तलावात घडली आहे. या अपघातात सानिया ज्ञानेश्वर सुरवसे (14),दीपक ज्ञानेश्वर सुरवसे (16), कृष्णा परमेश्वर सुरवसे(16), असे मयतांची नावे आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, जामखडे तालुक्यातील खर्डा येथे राहणाऱ्या सुरवसे कुटुंबात एका वृद्ध व्यक्तीचे निधन काही दिवसांपूवी झाले.सुरवसे कुटुंबातील काही महिला सुतक फेडणासाठी 5 ऑक्टोबर रोजी पाझर तलावावर कपडे धुण्यासाठी गेले असता कुटुंबातील सानिया ज्ञानेश्वर सुरवसे हिचा पाय घसरून ती पाण्यात पडली आणि बुडू लागली. तिला बुडताना पाहून तिचा सख्खा भाऊ दीपक आणि चुलत भाऊ कृष्णा हे दोघे पाण्यात तिला वाचवण्यासाठी गेले.मात्र त्यांना पाण्याच्या अंदाज आला नाही आणि तेही पाण्यात बुडू लागले. त्या तिघांना वाचवण्यासाठी त्यांची आई देखील पाण्यात उतरली आणि पाण्यात बुडू लागली.

आईला तिथे असलेल्या लोकांनी वाचवले मात्र तिघे मुले पाण्यात बुडून मृत्युमुखी झाली. इतर महिलांनी आरडाओरड केल्यामुळे गावाचे लोक घटनास्थळी आले आणि त्यांनी तिघांना पाण्यातून बाहेर काढले आणि तातडीनं रुग्णालयात नेले मात्र त्यापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिघांचे शवविच्छेदन केल्यावर मृतदेह नातेवाईकांना दिले. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे कुटुंबात शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.  
 
Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नवरात्रीच्या उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये? योग्य नियम जाणून घ्या

शारदीय नवरात्री 2024 : नऊ देवींची नऊ रूपे जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

तुम्हाला पुन्हा पुन्हा कॉफी पिण्याचे व्यसन लागले आहे का? या 10 मार्गांनी ही सवय सुधारा

सावळी त्वचा असल्यास अशी घ्यावी काळजी, त्वचा होईल चमकदार

सर्व पहा

नवीन

अजित पवार यांनी पंचशक्ती उपक्रमाची घोषणा केली, लोकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना केल्या जातील

माजी उपमुख्यमंत्री सरकारी बंगला रिकामा करणार

कर्नाटकच्या मंत्र्यांनी वीर सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपने काँग्रेसवर सोडले टीकास्त्र

ठाण्यात क्रिप्टोकरन्सी स्कीममध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली एक कोटींची फसवणूक, एकाच कुटुंबातील 19 जणांवर गुन्हा दाखल

केकमुळे कॅन्सर होऊ शकतो! कर्नाटकातून आली मोठी बातमी

पुढील लेख
Show comments