Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘मुंबईचे वाटोळे शिवसेनेनेच केले’ - जयंत पाटील

jayant patil
Webdunia
शनिवार, 16 मार्च 2019 (09:15 IST)
काल मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पादचारी पुलाचा भाग कोसळला. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला, तर ३१ जण जखमी झाले. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सचिन आहिर  यांनी जी. टी. रुग्णालयात जाऊन जखमींचा विचारपूस केली. या वेळी - जयंत पाटील म्हणाले की, ही अतिशय दुर्दैवी घटना घडली. स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही भ्रष्टाचार होऊ शकतो हे पहिल्यांदाचे कळाले. ऑडिट करताना वरवर काम केल्यामुळे ही घटना घडली आहे.
 
मुख्यमंत्र्यांनी काही लाखांची मदत जाहीर केली, पण त्याने काही होत नाही. जे मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबातील जबाबदार व्यक्तीला सरकारी नोकरीत तातडीने रुजू करून घ्यावे. अपघातानंतर महापालिका आणि रेल्वेने जबाबदारीची टोलवाटोलवी केली. मुंबई महानगरपालिकेत युतीचे सरकार आहे. भाजपाने शिवसेनेला जाब विचारायला हवा. पण शिवसेनेचे पक्षाध्यक्ष युती करण्यातच गर्क आहेत. ते सत्ता मिळवण्यातच मग्न आहेत. म्हणूनच इथे यायला त्यांना वेळ झालेला नाही. मुंबईचे वाटोळे शिवसेनेनेच केले आहे.  असे पाटील   म्हणाले आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

RR vs KKR Playing 11: राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघ आता बुधवारी एकमेकांसमोर येतील

BHIM UPI अॅप युजर्ससाठी चांगली बातमी, BHIM अॅपची आवृत्ती 3.0 लाँच

LIVE: कुणाल कामराच्या ' वक्तव्याला 'सुव्यवस्थित कट' असल्याचा एकनाथ शिंदेंचा आरोप

राज्यात 7 जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर, बळीराजा चिंतेत

नालासोपाऱ्यात वडिलांच्या त्रासाला कंटाळून तरुणीने वडिलांचा प्रायव्हेट पार्ट कापला

पुढील लेख
Show comments