Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पेटंट मिळवण्यासाठी महाराष्ट्र पुढे

Webdunia
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018 (09:08 IST)
स्वामित्व हक्क (पेटंट) मिळवण्यासाठी महाराष्ट्रातून गेल्या वर्षी साडेतीन हजारांहून अधिक अर्ज करण्यात आले असून याबाबत राज्याने अग्रस्थान घेतले आहे. याबाबतचा २०१६-१७ चा वार्षिक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून त्यात विविध राज्यांतून पेटंटसाठी ४५,४४४ अर्ज दाखल झाल्याची माहिती आहे.
 
राज्यातून गेल्या वर्षी पेटंटसाठी तब्बल ३,५१३ अर्ज करण्यात आले आहेत. मात्र, २०१५-१६च्या तुलनेत महाराष्ट्रातून ४ टक्के पेटंट अर्ज  कमी दाखल झाले आहेत. पेटंटसाठी अर्ज करण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे तर सर्वात पिछाडीवर हिमाचल प्रदेश आहे. महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडू २००३ अर्जासह दुसऱ्या तर कर्नाटक १७६४ पेटंट अर्जासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. अन्य राज्यांची याबाबतची स्थिती अशी. (कंसातील आकडे संबंधित राज्यांच्या अर्जाचे) दिल्ली (१०६६), तेलंगणा (७९८), उत्तर प्रदेश (६२५), गुजरात (६२०), पश्चिम बंगाल (४६०), हरियाणा (४४१), केरळ (२७६), आंध्र प्रदेश (२७१), पंजाब (२०७), राजस्थान (१८१), झारखंड (१४४), मध्य प्रदेश (१४०), ओरिसा (१०३), आसाम (६८), उत्तराखंड (६४), जम्मू-काश्मीर (४९), हिमाचल प्रदेश (४०). 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments