Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जलयुक्त शिवारच्या कामात गैरव्यवहार झाल्याची सरकारचीच कबुली..

जलयुक्त शिवारच्या कामात गैरव्यवहार झाल्याची सरकारचीच कबुली..
Webdunia
देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा गाजावाजा करत सुरू केलेली ‘जलयुक्त शिवार’ ही फसवी योजना असल्याचं आता उघड झालंय. जलयुक्त शिवारच्या कामात गैरव्यवहार झाल्याची कबुली आता सरकारनेच दिली आहे. बाळासाहेब चौधरी यांनी पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेत अनियमितता झाली असल्याची तक्रार केली होती. विधानपरिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासात या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला असतांना जलसंधारण विभागाने जलयुक्त शिवाराच्या कामांत अनियमितात झाल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या फसव्या योजनेने अखेर सरकारलाच तोंडघशी पाडले आहे. पावसाळी अधिवेशनात जलयुक्त शिवार योजनेवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.
 
दरम्यान राज्यात जलयुक्त शिवाराच्या कामात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणातील तत्कालीन कृषी आयुक्तांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातोय का? या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी दिरंगाई का केली जात आहे? असे प्रश्न उपस्थित करत गैरव्यवहारात सहभागी कर्मचाऱ्यांविरोधात एसीबी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  यांनी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नीम करोली बाबा हनुमान चालिसा याबद्दल काय म्हणाले होते?

लग्नात नव्या नवरीच्या गळ्यात घातले जाणारे मंगळसूत्र उलटे का असतात जाणून घ्या

२७ फेब्रुवारीनंतर या ३ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकेल ! शुक्र आणि बुध यांच्या युतीने लक्ष्मी नारायण योग तयार होईल

साखर नियंत्रणासाठी ही प्रभावी आसने अवश्य करून पहा

प्रेशर कुकरमध्ये या सात गोष्टी कधीही शिजवू नये, चव आणि गुणवत्ता नष्ट होऊ शकते

सर्व पहा

नवीन

मीरा-भाईंदर :लग्नाच्या वादातून प्रेयसीची हत्या, आरोपीला अटक

मार्च महिन्यात बँका 14 दिवस बंद राहतील, संपूर्ण यादी पहा

LIVE: समृद्धी महामार्गवर 3 ट्रकची धडक, एकाचा मृत्यू , 2 जखमी

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याची पाकिस्तानी नंबर वरून धमकी

मुंबईतील गगनचुंबी इमारत जळून खाक, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी

पुढील लेख
Show comments