Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रात्रभर मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार

Webdunia
गुरूवार, 22 सप्टेंबर 2022 (22:11 IST)
लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावरून एलपीजीची वाहतूक करणारा टँकर नदीत कोसळला आहे. यामुळे टँकमधून एलपीजी गॅसची गळती सुरु असून सावधानता म्हणून आज रात्रभर मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
 
एलपीजी टँकरची गळती तात्पुरत्या स्वरुपात रोखण्यात आली आहे. उरण आणि गोव्यावरून दोन टीम अपघात स्थळी पोहोचणार आहेत.  दुपारी तीन वाजता हा अपघात झाला आहे. पुलाचा कठडा तोडून टँकर पाण्यात कोसळला आहे. या टँकरमध्ये २८००० किलो एवढा प्रचंड एलपीजी गॅस भरलेला आहे.
 
हा कंटेनर मुंबईहून गोव्याच्या दिशेने काँप्रेस्ड एलपीजी घेऊन जात होता. लांजा तालुक्यातील आंजणारी पुलादरम्यान हा कंटेनर आला असता अपघातग्रस्त झाला. मुंबई गोवा महामार्गावरील या भागातून जाणार टप्पा बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग आंजणारी पुलाच्या अलीकडून पालीमध्ये बाहेर पडणारा आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

LIVE: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली

नेपाळी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर ५ जणांना अटक

देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना दिला इशारा, बैठकीपूर्वी अजेंडा लीक झाल्याने मुख्यमंत्री संतापले

शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या स्थापनेवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- यात काहीही चुकीचे नाही

खेळताना पाण्याच्या टाकीत पडून तीन मुलींचा मृत्यू

पुढील लेख
Show comments