suvichar

नर्मदेत प्रवासी बोट उलटली पाच ठार, ४० पेक्षा अधिक वाचवले

Webdunia
बुधवार, 16 जानेवारी 2019 (09:08 IST)
नर्मदा नदीमध्ये प्रवासी बोट उलटली आहे. या बोटीमधून ६६ जण प्रवास करत होते अशी माहिती समोर येत आहे. धाडगाव तालुक्यातल्या भुसा पाईंटजवळ ही घटना घडली आहे. यामध्ये ४२ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. इतर जण बुडाले असून त्यांचा शोध सुरु आहे. क्षमतेपेक्षा अधिक जण बोटीत बसल्यामुळे ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे.  या बोट दुर्घटनेमध्ये ५ जणांचा बुडून मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.या घटनेत मरण पावलेल्यांमध्ये दोन लहान मुले, एक बालक, एक तरुण आणि एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. ही दुर्घटना महाराष्ट्र हद्दीतील धडगाव तालुक्यात भूषा या गावाजवळील नर्मदा नदीच्या पात्रात घडली. या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. सर्व प्रवासी महाराष्ट्रातील आहेत. या घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी तातडीने धावून गेले.  भूषा येथे मकरसंक्रांतीनिमित्त नर्मदा नदीपात्रात अंघोळ करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. मंगळवारीही भाविकांची गर्दी झाली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

अक्कलकोट तालुक्यात महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली

सावत्र आई आणि मुलाच्या प्रेमप्रकरणाचा दुःखद शेवट; अंबाजोगाईमध्ये एक लाजिरवाणी घटना

महाराष्ट्र सरकारने १ जून ते ३१ जुलै २०२६ पर्यंत किनारपट्टीच्या भागात मासेमारीवर बंदी घातली

LIVE: महाराष्ट्रात सागरी मासेमारीवर बंदी

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून वाघ गायब! वनविभागात खळबळ

पुढील लेख
Show comments