Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक : “वर्षभराची माझी मेहनत दहा मिनिटांमध्ये वाया गेली”; गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान…

Webdunia
सोमवार, 27 नोव्हेंबर 2023 (08:39 IST)
दुपारी तीन वाजेच्या सुमारास निफाड परिसरात बेमोसमी पावसाने धिंगाणा घातल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रचंड वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि गारपीट या तिहेरी माऱ्यामुळे द्राक्ष बागा पूर्णपणे उध्वस्त झालेल्या असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. निफाड येथील शेतकरी संजय भाऊ गोळे यांनी आपल्या द्राक्ष बागेची परिस्थिती कथन करताना सांगितले की, “वर्षभराची मेहनत माझी दहा मिनिटांमध्ये वाया गेली.

आमच्या घराचे संपूर्ण उत्पन्न हे फक्त द्राक्ष बागेवर आणि गहू कांदा या पिकांवर अवलंबून होते. मात्र जेमतेम दहा मिनिट झालेल्या गारपिटीमुळे आम्ही पूर्णपणे उध्वस्त झालो आहोत. जिंदगीत कधी पाहिले नव्हता एवढा मुसळधार पाऊस आणि दगडासारख्या गारा हे दृश्य हादरवून टाकणारे होते.”
 
आणि हे म्हणणे फक्त एकट्या संजय गोळे यांचे नसून परिसरातील सर्व शेतकऱ्यांना द्राक्ष बागायतदारांना हा फटका सहन करावा लागलेला आहे.
 
संपूर्ण द्राक्ष बागा उध्वस्त झालेल्या असून हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने क्षणात हिरावून घेतलेला आहे. त्यामुळे आता त्यांना बोलणे सुद्धा अशक्य होऊन बसलेले आहे. या गारपिटीबरोबर तब्बल तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व शेतांमध्ये पाणी साचले असून जेमतेम महिना भराची कोवळी असलेली गहू कांदा व हरभरा यांची रोपे पूर्णपणे नष्ट झालेली आहेत. टोमॅटो वांगे ऊस भाजीपाला या सुद्धा सर्व पिकांना प्रचंड फटका बसलेला आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

महिला डॉक्टरने नगरसेवक प्रियकराला लग्नासाठी बोलावले, नकार दिल्यामुळे त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला

महाराष्ट्र विधानपरिषदेत राहुल गांधींच्या 'हिंदू' वक्तव्यावर शिवीगाळ आणि प्रचंड गोंधळ

आता भगवान शिवाची प्रतिमा असलेले राहुल गांधींचे पोस्टर्स प्रदर्शित केले जातील

मेलबर्नहून दिल्लीला येणाऱ्या विमानात भारतीय तरुणीचा मृत्यू

Weather Update News :राज्यातील या भागांना अति मुसळधार पावसाचा इशारा

सर्व पहा

नवीन

मुंबई महानगर क्षेत्रात होर्डिंगसाठी नवीन धोरण तयार करण्यात येणार - उदय सामंत

फोनपे वापरकर्त्याची 5 लाख रुपायांची फसवणूक, आरोपींना अटक

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटींमुळे विधवा आणि निराधार महिलांना लाभ मिळणार नाही?

राहुल गांधी यांच्या 'हिंदू' संदर्भातील विधानावरुन गदारोळ, पंतप्रधान मोदी आणि शाह काय म्हणाले?

हिंदू समाजाला हिंसक म्हटल्या प्रकरणात राहुल गांधी यांनी जाहीर माफी मागावी- देवेंद्र फडणवीस

पुढील लेख
Show comments