Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुप्रीम कोर्टाची मोदी सरकारला जोरदार चपराक - नवाब मलिक

Webdunia
- आलोक वर्मा यांना हटवण्याचा निर्णय न्यायालयाने रद्द केल्याबद्दल मलिक यांची प्रतिक्रिया
 
सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा आदेश रद्द करत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला मोठा झटका दिला आहे. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना हटवण्याआधी निवड समितीची परवानगी घ्यायला हवी होती. ज्या पद्धतीने सीव्हीसीने आलोक वर्मा यांना हटवले, ते संविधानाच्या विरोधात आहे, असे सांगत सुप्रीम कोर्टाने आलोक वर्मांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा आदेश रद्द केला आहे. वर्मा यांना हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता, हा निर्णय कोर्टाने रद्द करुन मोदी सरकारला एक चपराक लावली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक  यांनी केली आहे.

त्याचप्रमाणे धोरणात्मक निर्णय हा वेगळा विषय आहे. पण ज्या केसेस आलोक वर्मा हाताळत होते त्याचे सर्व अधिकार हे त्यांच्याकडेच आहेत. त्या केसेसमध्ये अनेक मोठे अधिकारी व मोठ्या मंत्र्यांची नावे आहेत. राफेल सारखे प्रकरण त्यांच्या हातात होते. त्या सर्व प्रकरणात ते योग्य निर्णय घेतील असा लोकांना विश्वास आहे, असेही मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments