Dharma Sangrah

रिक्षाचालक जिद्दीने बनले महापौर, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची सत्ता

Webdunia
शनिवार, 4 ऑगस्ट 2018 (16:09 IST)
परी चिंचवड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक घेण्यात आली असून, सत्ताधारी भाजपचे महापौरपदाचे उमेदवार राहुल जाधव यांना 80 मतं मिळाली आहेत. राष्ट्रवादी उमेदवार 33 मतं मिळाली आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे ३ नगरसेवक गैरहजर राहिले असून,  भाजपचेही ३ नगरसेवक गैरहजर राहिले. त्यामुळे महापौरपदी भाजपचे राहुल जाधव विजयी झाले. उपमहापौरपदी भाजपच्याच सचिन चिंचवडे यांची निवड झाली आहे. त्यामुळे भाजपा गड राखण्यात यशस्वी झाला आहे. तर सांगली आणि जळगाव येथे नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत भाजपाची पूर्ण सत्ता आली असून, मराठा मोर्चा आणि याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही.
 
महापौर राहुल जाधव यांचा नगरसेवक ते थेट महापौर असा राजकीय कारकिर्दीचा चढता आलेख जरी दिसत असला तरी हा प्रवास त्यांच्यासाठी खूप खडतर होता. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या जाधव यांनी आपल्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी पिंपरी चिंचवड शहरात तब्बल 5 वर्षे रिक्षा चालवलेली असून ते जिद्दीवर आज ते त्यांच्या शहराचे प्रथम नागरिक बनले आहेत.
 
पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी त्यांनी मनसेला रामराम केला व भाजपमध्ये प्रवेश केला. दादांचे कट्टर पाठीराखे असल्याने लगेच त्यांची स्थायी समितीवर वर्णीही लागली. स्थायीचे अध्यक्ष न झाल्याने त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आता ते पिंपरी चिंचवडचे महापौर म्हणून काम करणार आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

शिवनेरीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस गर्जना: किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याची प्रतिज्ञा घेतली

T20I विश्वचषकात श्रीलंकेला त्यांच्याच मैदानात हरवून झिम्बाब्वेने मोठा धक्का दिला

तारिक रहमान पंतप्रधान झाल्यानंतर बांगलादेशने घेतला मोठा निर्णय: भारतीय विमान कंपन्यांसाठी हवाई क्षेत्र बंद

ऑस्ट्रेलियाने भारताला एकोणीस धावांनी हरवून मालिका बरोबरीत आणली

जबलपूर मंदिरात तोडफोडीमुळे तणाव,हाणामारी आणि दगडफेक,परिस्थिती नियंत्रणात

पुढील लेख
Show comments