Marathi Biodata Maker

रिक्षाचालक जिद्दीने बनले महापौर, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची सत्ता

Webdunia
शनिवार, 4 ऑगस्ट 2018 (16:09 IST)
परी चिंचवड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक घेण्यात आली असून, सत्ताधारी भाजपचे महापौरपदाचे उमेदवार राहुल जाधव यांना 80 मतं मिळाली आहेत. राष्ट्रवादी उमेदवार 33 मतं मिळाली आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे ३ नगरसेवक गैरहजर राहिले असून,  भाजपचेही ३ नगरसेवक गैरहजर राहिले. त्यामुळे महापौरपदी भाजपचे राहुल जाधव विजयी झाले. उपमहापौरपदी भाजपच्याच सचिन चिंचवडे यांची निवड झाली आहे. त्यामुळे भाजपा गड राखण्यात यशस्वी झाला आहे. तर सांगली आणि जळगाव येथे नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत भाजपाची पूर्ण सत्ता आली असून, मराठा मोर्चा आणि याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही.
 
महापौर राहुल जाधव यांचा नगरसेवक ते थेट महापौर असा राजकीय कारकिर्दीचा चढता आलेख जरी दिसत असला तरी हा प्रवास त्यांच्यासाठी खूप खडतर होता. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या जाधव यांनी आपल्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी पिंपरी चिंचवड शहरात तब्बल 5 वर्षे रिक्षा चालवलेली असून ते जिद्दीवर आज ते त्यांच्या शहराचे प्रथम नागरिक बनले आहेत.
 
पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी त्यांनी मनसेला रामराम केला व भाजपमध्ये प्रवेश केला. दादांचे कट्टर पाठीराखे असल्याने लगेच त्यांची स्थायी समितीवर वर्णीही लागली. स्थायीचे अध्यक्ष न झाल्याने त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आता ते पिंपरी चिंचवडचे महापौर म्हणून काम करणार आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

बांगलादेशात हिंदू व्यक्तीवर धारदार शस्त्रांनी हल्ला, नंतर पेट्रोल ओतून जाळून टाकले

हे काय ! शिवसेनेच्या उमेदवाराने स्वतःच्याच नेत्याचा एबी फॉर्म फाडून गिळला

चालत्या व्हॅनमध्ये क्रूरता, नंतर पीडितेला रस्त्यावर फेकून दिले; या प्रकरणाने देशाला हादरवून टाकले

आदित्य ठाकरेंच्या कोअर टीमला मोठा धक्का: शीतल देवरुखकर-शेठ उद्धव ठाकरेंच्या पक्षातून बाहेर पडून भाजपमध्ये सामील

बीएमसी निवडणुकीत मतविभाजनाची भीती संपली ? ३२ जागांवर 'तिसरी आघाडी' नसेल, दोन आघाड्या आमनेसामने येतील

पुढील लेख
Show comments