Festival Posters

राज ठाकरे यांची उत्तरसभा आता १२ एप्रिलला होणार

Webdunia
शुक्रवार, 8 एप्रिल 2022 (07:35 IST)
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी जिथे मशिदींवर भोंगे लावून अजान सुरू असेल तिथे दुप्पट लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिले. राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर सत्ताधारी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. या सगळ्यांची उत्तर देण्यासाठी राज ठाकरे ९ एप्रिल रोजी ठाण्यात उत्तरसभा घेणार होते. पण हीच उत्तरसभा आता १२ एप्रिलला होणार आहे, याबाबतची माहिती मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिली.
 
पत्रकार परिषद घेऊन अभिजीत पानसे सांगितले की, ‘राज ठाकरे यांची उत्तरसभा ९ एप्रिलला जाहीर केली होती. पण ठाणे पोलिसांनी सभेला परवानगी न दिल्यामुळे  मनसे नेते बाळा नांदगावकर, राजू पाटील, संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि मी ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. ठाणे पोलिसांनी रस्तावर सभा घेऊ नका मैदानावर घ्या अशी सूचना दिली होती. पण दुर्दैवाने ठाणे शहरात एकही मैदान नाही. कुठलाही पर्याय नसल्यामुळे गडकरी रंगायतन समोरील रोड तलावपालीवरती सभेचे आयोजन करण्यात आल्याचे निवेदन देण्यात आले. याला परवानगी देण्यासाठी पोलिसांकडून विलंब होत होते. त्यांच्यावर कोणाचा दबाव होता, याची कल्पना नाही.’
 
पुढे पानसे म्हणाले की, ‘दरम्यान चैत्र नवरात्र सुरू आहे, सुट्टीचा दिवस आहे, अष्टमीचा दिवस असल्यामुळे आमच्या अनेक भगिनी दर्शनाला बाहेर पडतात. याच गर्दीचा परिणाम वाहतूक, जनमाणसावर होईल म्हणून पोलिसांना १२ तारखेचा पर्याय दिला होता. याला पोलिसांनी परवानगी दिली आहे. १२ तारखेला त्याच ठिकाणी राज ठाकरेंची उत्तरसभा होणार आहे.’

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतील १७ जागांसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला

सोलापूरमध्ये हॉटेलच्या खोलीत रील स्टार रोहिणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला; ३० जूनपूर्वी २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची माफी दिली जाणार

नाशिक जिल्ह्यातील काश्यपी धरणात जोडपे आणि दोन किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पुढील लेख
Show comments