Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजू शेट्टी पुन्हा आक्रमक, मुख्यमंत्र्यांच्या घरावर चाल करणार असा दिला इशारा

Webdunia
मंगळवार, 11 जून 2019 (16:22 IST)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी अमरावती जिल्ह्यातील लोणी (ता. वरूड) येथे झालेल्या दुष्काळ पाणी परिषदेत त्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.  
 
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे आठ दिवसांत तातडीने पंचनामे करावेत व वाळलेल्या संत्रा बागेला १ लाख तसेच टँकरने पाणी घालून जगविलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यास एकरी ५० हजार रूपये तातडीची मदत करावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी या परिषेदत केली. गरज पडल्यास शेतकरी प्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या घरावर चाल करणार, असा इशाराही त्यांनी दिलाय. या परिषेदत अनेक मागण्या सर्वानुमते करण्यात आल्या.
 
जलयुक्त शिवार योजनेमध्ये वरूड तालुक्यात ५०० कोटी रूपये खर्चूनही कूपनलिकेला १२०० फुटांपर्यंत पाणी लागेना. मग इतका पैसा खर्च करूनही हे पाणी मुरले कुठे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे यामध्ये झालेल्या भ्रष्ट्राचाराची निवृत्त अभियंता व सुशिक्षीत बेरोजगार अभियंत्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments