rashifal-2026

सलाम कॉन्स्टेबल रेहाना

Webdunia
शनिवार, 12 जून 2021 (18:32 IST)
कोरोना विषाणू साथीचा रोग सर्वांसाठी संकट घेऊन आला आहे. या विषाणूच्या संसर्गामुळे अनेकांना आपल्या जवळच्या लोकांना गमवावे लागले आहे.याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे अनेकाना आपली नोकरी गमवावी लागली आहे त्यामुळे त्यांच्या वर संकटाचे सावट आले आहे.अशा संकटकाळी अनेकांनी समाजसेवा करून लोकांना मदतीचा हातभार लावला आहे आणि वेळोवेळी त्यांची मदत केली आहे. या साथीच्या आजारामुळे कित्येक लोक अनाथ झाले आहे. 
 
अशा लोकांना मदतीचा हात देण्यासाठी समाजातील काही चांगली  माणसे पुढे आली त्यापैकी एक आहे महिला कॉन्स्टेबल रेहाना शेख. यांनी कोरोनाच्या संकटाच्या काळात अनेकांना मदत केली.त्यांनी गरजूंना ऑक्सिजन  रक्त ,प्लाझ्मा पुरवले .त्यांनी या काळात आपल्या आई-बाबाना गमावलेल्या तब्बल 50 अनाथ मुलांना सांभाळण्याची जबाबदारी  घेऊन त्यांची इयत्ता 10 वी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी देखील घेतली आहे.
 
आपल्या या कार्याबाबद्दल त्या सांगतात की मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी तयारी करताना रायगड जिल्ह्यातील वाजेतालुक्यात असलेल्या या ज्ञानी विद्यालयाची माहिती मिळाली तिथे भेट दिल्यावर समजले की या मुलांना आपल्या मदतीची कितीतरी गरज आहे.हे बघून मी माझ्या मुलीच्या वाढदिवसासाठी जमा केलेले पैसे या मुलांच्या शिक्षणासाठी देण्याचा विचार केला.
 
त्यांच्या या कार्यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
त्यांना समाजकार्याची खूप आवड असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या या समाजकार्यामुळे त्यांच्या पतीने त्यांचे नाव मदर तेरेसा ठेवले आहे. त्यांच्या या कारकिर्दीला सलाम.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

विद्यार्थिनी NEET परीक्षेला बसू शकली नाही; ग्राहक न्यायालयाने भारतीय रेल्वेला ठोठावला 9 लाख रुपयांचा दंड

UGC Equity Rules: भेदभावाबाबत UGC च्या नवीन मार्गदर्शक तत्वांवरून वाद का निर्माण झाला आहे? नवीन नियम काय म्हणतात?

देशभरातील हवामान बिघडणार, सात राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा जारी

लाडक्या बहिणींना 2100 कधी; एकनाथ शिंदेंनी केलं जाहीर

सरकारी शाळांची वाईट अवस्था, प्रजासत्ताक दिनी मुलांना पुस्तकांच्या फाटलेल्या पानांवर मध्यान्ह भोजन देण्यात आले

पुढील लेख
Show comments