Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

समृद्धी बस अपघात : त्या बसचालकाच्या रक्तात सापडले अल्कोहोल, फॉरेन्सिक तपासात उलगडा

Webdunia
शुक्रवार, 7 जुलै 2023 (20:09 IST)
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असलेल्या एका खासगी बसला 1 जुलैच्या पहाटे भीषण अपघात झाला होता. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेत आता गंभीर माहिती पुढे येत आहे.
 
बसचा ड्रायव्हर दानिश इस्माईल शेख याच्या रक्तात अल्कोहोलचं प्रमाण आढळून आल्याचं फॉरेन्सिक तपासात निष्पन्न झालं आहे.
 
बुलढाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी याबाबत माहिती दिली. या प्रकरणी माहिती दिली. दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा गुन्हाही शेख याच्यावर दाखल होणार असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं.
 
समृद्धी महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून अपघातांचं सत्र सुरूच आहे. यातला सगळ्यांत मोठा अपघात 1 जुलैच्या पहाटे घडला.
 
यात 33 प्रवाशांनी भरलेली स्लीपर कोच बस नागपूरहून पुण्याच्या दिशेनं येत होती. दरम्यान, बुलडाण्यातील सिंदखेड राजाजवळ बसचं टायर फुटून ती चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली. पुढे ती एका खांबाला जाऊन धडकली. यानंतर फरपटत एका छोट्या पुलावर जाऊन आदळली.
या धडकेत बसच्या डिझेल टँकवर आघात होऊन तो फुटला. दरम्यान, ठिणग्याही उडाल्याने बसने पेट घेतला. या आगीतच 25 प्रवाशांना दुर्दैवाने प्राण गमवावे लागले.
 
या अपघातात वाचलेल्या 8 प्रवाशांनी काच फोडून कसाबसा बाहेर प्रवेश मिळवल्याने त्यांना आपले प्राण वाचवता आले. यातल्या मृतांचे मृतदेहांवर प्रशासनानेच सामूहिक अंत्यसंस्कार केले.
 
या घटनेचा बुलढाणा पोलीस सविस्तर तपास करतायत. यात ड्रायव्हर शेख याने सुरुवातीला बसचा टायर फुटून हा अपघात झाल्याचं सांगितलं होतं. मात्र, आता पोलीस तपासात वेगळंच कारण पुढे आलंय.
 
बुलढाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या फॉरेन्सिक लॅबमधून ड्रायव्हरच्या ब्लड सँपलचा अहवाल प्राप्त झाला आहे.
 
त्यात 0.30 टक्के अल्कोहोल त्यांच्या रक्तात अल्कोहोल आढळला आहे. अपघाताची घटना रात्री 1.30 वाजताची आहे आणि ब्लड सँपल सकाळी घेतलं होतं. दारू प्यायल्यानंतर बराच कालावधी यात निघून गेला होता. त्यामुळं शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण कमी कमी होत गेलं आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
 
त्यांच्या मते, दारू प्यायल्यानंतर लगेच सँपल घेतलं तर जास्त येतं. परंतु या घटनेत दारू पिऊन 12 तासांचा अवधी उलटून गेला होता. तरीही त्याचा दारू प्यायल्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अपघाताला हे सुद्धा एक कारण आहे. अधिक चौकशी सुरू आहे त्यानंतर अनेक बाबी स्पष्ट होतील. दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल होणार आहे.
Published By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मान्सूनने अख्खा भारत व्यापला, जुलैत पाऊस कसा असेल? जाणून घ्या

Weather News : राज्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळण्याची शक्यता

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे मतदारांना आवाहन

डोनाल्ड ट्रंप यांना कॅपिटल हिल दंगलप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा दिलासा, न्यायालयाने काय म्हटलं? वाचा

विधान परिषद सभागृहात शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवे यांचं निलंबन

सर्व पहा

नवीन

Hathras incident: हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर

180 कोटी रुपयांचे कर्ज न भरल्याचे प्रकरण, विजय मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

हाथरसमध्ये सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा 100 पेक्षा जास्त

नरेंद्र मोदींचं राहुल गांधींना 'बालक बुद्धी' संबोधून प्रत्युत्तर पण 'मणिपुरा'त वाहून गेलं भाषण

भारत न्याय संहिता लागू; यापुढे जुन्या IPC कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांवर काय परिणाम होतील?

पुढील लेख
Show comments