Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना वाढल्यामुळे औरंगाबादमध्ये शाळांना पुन्हा सुट्टी

Webdunia
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (09:21 IST)
औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांच्या सख्येत पुन्हा वाढ होत आहे. परिस्थिती नियंत्रणात राहावी, यासाठी शहरातील इयत्ता ५ वी ते ९ वी आणि ११ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी २२ ते २८ फेब्रुवारीपर्यंत शाळेत उपस्थित राहण्यापासून सूट देण्यात आली आहे. त्यांचे वर्ग पुर्वीप्रमाणेच ऑनलाईनपद्धतीने सुरु राहील. परंतु १० वी, १२ वीच्या बोर्ड परिक्षा असल्याने या विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यास मुभा दिली आहे, अशी माहिती महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांड्ये यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.  
 
शहरात कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने इयत्ता ५ ते १२ वी पर्यंतच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागल्याने व काही शाळांमध्ये कोरोना रुग्ण अढळल्याने कोरोनाची बाधा विद्यार्थ्यांना होऊ नये, शाळांमधून कोरोनाचा प्रसार अधिकप्रमाणात होऊ नये म्हणून इयत्ता ५ वी ते ९ वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यातून शहरातील १० वी आणि १२ वीचे  वर्ग वगळण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांनी शाळेत न येता पुर्वीप्रमाणे ऑनलाईन वर्ग करावेत, असेही प्रशासक पांड्ये यांनी सांगितले. त्याबाबत सर्व शाळांना सूचना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ही बंदी २२ ते २८ फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

तो नॅपी धीरेंद्र शास्त्री आहे, मी त्याच्या वयाइतकीच वर्षे तपश्चर्या केली आहे, ममता कुलकर्णी संतापल्या

लग्नात नवरदेवाने 'चोली के पीछे क्या है' गाण्यावर नाच केला, वधूच्या वडिलांनी तोडले लग्न

LIVE: आदित्य ठाकरे शिंदेंच्या शिवसेनाला देशद्रोही टोळी म्हणाले

अर्थसंकल्पावरून काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी मोदी सरकारवर टीका केली

गोधरा रेल्वे घटनेतील आरोपीला चोरीच्या आरोपाखाली पुण्यात अटक

पुढील लेख
Show comments