Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवसेनेकडून ठाणेकरांची घोर फसवणूक : अभिजित पानसे

Webdunia
बुधवार, 8 डिसेंबर 2021 (15:45 IST)
गेल्या १० वर्षामध्ये ठाण्यात शिवसेनेनं आपल्या वचननाम्याप्रमाणं ठाणेकरांचं एकही काम केलं नाही. इथल्या जनतेची फसवणूक केलीय, असा आरोप मनसे नेते अभिजित पानसे आणि अविनाश जाधव यांनी केलाय.
 
ते म्हणाले की, ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०१७ मध्ये शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात अनेक लेखी आश्वासनं देऊन घरोघरी जाऊन छापील पत्रकं वाटली होती. मात्र एकाही आश्वासनाची पूर्तता न करता ठाणेकरांची फसवणूक केली असा आरोप त्यांनी केला. मनसेच्या वतीने सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते ठाणे महापालिका मुख्यालयापर्यंत जनजागरण मोर्चा काढणार असल्याचे ते म्हणाले.
 
महापालिका हद्दीत शिवसेनेच्या वतीने आरोग्य कवच योजना, धरण क्षेत्र, ३० एकरमध्ये सेंटर पार्क, धरण बांधकाम, क्लस्टर योजना, ५०० चौरस फूट कर माफ, जल वाहतूक सुविधा अशी अनेक आश्वासने देण्यात आली होती. मात्र यातलं एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही, असा आरोप मनसेतर्फे करण्यात आलाय.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments