Marathi Biodata Maker

धक्कादायक! मुंबईतून अचानक लहान मुले बेपत्ता

Webdunia
बुधवार, 6 डिसेंबर 2023 (18:58 IST)
महाराष्ट्र राज्याची कायदा  सुव्यवस्था अधिक प्रगत आणि बलाढ्य करण्याची गरज असल्याचे दावे एनसीआरबी (NCRB Report)च्या ताज्या अहवालातून उघड झाले आहे. या अहवालानुसार राज्यात हिंसाचार आणि दंगलीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून देशात सर्वाधिक दंगलीच्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहे. 
एनसीआरबीच्या अहवालात सर्वाधिक दंगली आणि हिंसाचार घडणाऱ्या राज्याच्या यादीत महाराष्ट्र दुसऱ्या  स्थानावर आहे. 

आता मुंबईतून धक्कादायक माहिती  मिळाली असून गेल्या 48 तासात नवी मुंबई येथून 6 अल्पवयीन मुलं बेपत्ता झाले असल्याचे समोर आले आहे. पालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

सध्या मुंबईत अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांना विकले जात असल्याची माहिती समोर आली आहे. 
गेल्या 48 तासांत नवी मुंबईतून कोपरखैरणे, कामोठे, पनवेल, कळंबोली, आणि रबाळे या परिसरातून 12 ते 15 वयोगटाची 6 अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्यामुळे पोलीस प्रशासन च्या यंत्रणेवर मोठा प्रश्न उद्भवत आहे. अद्याप या मुलांचा शोध लागला नाही. बेपत्ता झालेल्या मुलांच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून मुलांचा शोध तातडीनं लावण्याची मागणी केली आहे. पोलीस या घटनेमुळे सतर्क झाले असून मुलांचा शोध घेण्यासाठी टास्कफोर्सची स्थापना केली असून मुलांचा शोध लावण्याचे कार्य सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

व्हॉट्सॲपच्या नवीन फीचर्स मुळे चॅटबॉक्स न उघडता कोण ऑनलाइन आहे समजेल

LIVE: वाशिमचे माजी शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेश मापारी यांचा भाजपमध्ये प्रवेश

विदर्भात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, वाशिमचे माजी शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेश मापारी यांचा भाजपमध्ये प्रवेश

नांदेडमध्ये ४३ लाखांहून अधिक किमतीची ४,७९६ घातक शस्त्रे जप्त

पाकिस्तानमधील क्वेट्टा येथे रेल्वे रुळाजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यात २६ जण ठार

पुढील लेख
Show comments