Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तर राज्यातील दारुची दुकानंही बंद….

Webdunia
सोमवार, 10 जानेवारी 2022 (08:37 IST)
कोरोनाच्या ओमायक्रॉनचा संसर्ग राज्यात आणि देशात झपाट्याने वाढत असताना, शनिवारी काही निर्बंध लावण्यात आले आहेत.
यामध्ये दारूच्या दुकानावर गर्दी होत असेल तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.
 
याची अंमलबाजवणी सोमवारपासून करण्यात येणार आहे. पुढे बोलताना टोपे म्हणाले की, सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत गर्दी कमी करुन दारुची दुकाने, रेस्टॉरंट यांना परवानगी देण्यात आली आहे.
 
त्यात यांना काही प्रमाणात सूट देण्यात आली असून गर्दी वाढली तर सगळेच बंद करावे लागेल, तसेच शाळाही बंद ठेवण्यात आल्यात मात्र दारुची दुकानं सुरु असल्यानं विरोधक टीका करतांना बघायला मिळत आहे.
 
त्यामुळं गर्दी होत असेल तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील असा इशारा टोपे यांनी दिला आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांत झपाट्यात वाढ होत असल्यानं नवे निर्बंध लागू करण्यात आलेत.
जोपर्यंत राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढून हॉस्पिटलमध्ये बेड कमी पडत नाही तोपर्यंत आणखी नवे निर्बंध लावले जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
धार्मिक स्थळांमध्येही गर्दी होत असेल, तर धार्मिक स्थळेही बंद करणार आणि त्याबाबतही टप्प्याटप्यानं निर्णय घेण्यात येईल असं टोपे यांनी म्हटलंय.
राज्यात ऑक्सीजनची मागणी नगण्य वाढली असून दखल घेण्यासारखी ही मागणी नाही असंही त्यांनी सांगितलं. कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्या लागतील, असे त्यांनी सांगितले आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख