Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यातील काही मंत्र्यांकडे वसुलीचे सॉफ्टवेअर – फडणवीसांचा सरकारवर गंभीर आरोप

Webdunia
शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (17:10 IST)
राज्यातील काही मंत्र्यांकडे वसुलीचे सॉफ्टवेअर आहे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला आहे.राज्यात इतकी प्रचंड दलाली सुरू आहे… खरं म्हणजे ही दलाली इतक्या स्तरावर पोहोचली आहे की, काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर तयार केलं आहे असं आयटीच्या छापेमारीत लक्षात येत आहे. हे महाराष्ट्रात सुरू असेल तर ईडी, सीबीआय राज्यात येणारच. जनतेशी बेईमानी करुन सत्तेत देवेंद्र फडणवीसांनी पुढे म्हटलं, मुख्यमंत्रिपदी असल्याने ठाकरे विसरले, जनतेने भाजपला नाकारलं नाही.
 
जनतेने काँग्रेस, राष्ट्रवादीला नाकारले. जनतेशी बेईमानी करुन तुम्ही सत्तेत आलात. जनतेशी बेईमानी करत शिवसेना, ठाकरे सत्तेत आहे. मुख्यमंत्री होण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होत, मुख्यमंत्रिपदाची महत्तवाकांक्षा लपून राहिलेली नाही.
 
मुख्यमंत्रिपदाची महत्तवाकांक्षा पूर्ण झाली आम्हाला दोष देऊ नका. एकूणच कालच्या मेळाव्यात ना विचार होतं, ना सोनं होतं. कालच्या मेळाव्यात केवळ मुख्यमंत्र्यांचं फ्रस्टेशन हे त्यांच्या तोंडून बोलत होतं. असंगाशी संग केला तर अशाच प्रकारचं फ्रस्टेशन होईल आणि शाच प्रकारचं वक्तव्य निघेल. मी केवळ इतकंच सांगतो भाजपला नामोहरण करण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न केला, तुम्ही सत्ता वापरील, पैसा वापरली तरी देखील नंबर एकचा पक्ष भाजपच होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एजन्सीजच्या विरोधात ईडी, सीबीआय याचं भय कुणाला असेल? ज्याने काही केलं असेल त्याला भय असेल. मी अगदी स्पष्टपणे सांगतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एजन्सीजच्या वापराच्या विरोधात आहेत.

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments