suvichar

लोकांमधला सामाजिक धाक कमी झाला आहे - सुप्रिया सुळे

Webdunia
दिवसेंदिवस राज्यात छेडछाडीचे प्रमाण वाढत आहे. दिल्लीच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका लहान मुलाची हत्या करण्यात आली. लोकांमधला सामाजिक धाक कमी झाला असल्यामुळेच अशा प्रकारांमध्ये वाढ होत आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे  यांनी व्यक्त केले. जागर युवा संवाद यात्रेनिमित्त इस्लामपूर येथे असताना त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
 
पुढे बोलताना सुळे म्हणाल्या की पूर्वी महिलांवरील अत्याचाराच्या घटना फार कमी ऐकायला मिळायच्या. आज रोज अशा घटना ऐकायला मिळतात. मुलांसाठी शाळांमध्ये असुरक्षित वातावरण तयार झाले आहे. समाज म्हणून हे आपले अपयश आहे. आपण सर्वांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असेही त्या म्हणाल्या. सरकारच्या कारभारावर टीका करत सुळे म्हणाल्या की सरकारचा विकासाचा एजेंडा बाजूला राहिला आहे. विकासाचा मुद्दा बाजूला ठेवत हे सरकार वेगळ्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहे. या सरकारच्या पारदर्शकतेचे काय झाले असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ऐन दिवाळीत या सरकारने गरीबांच्या तोंडची साखर पळवली. या सरकारच्या काळात सर्वच घटक निराश आहे अशी टीका खासदार सुळे यांनी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

Maharashtra Day 2026 Wishes in Marathi महाराष्ट्र दिन शुभेच्छा

मुंबई : कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणी मोठा खुलासा

LIVE: अमृत ​​भारत एक्सप्रेस ५ मे पासून मुंबई आणि अयोध्या दरम्यान नियमित सेवेसह धावणार

1 मे पासून अनेक नियम बदल, वाचा

Exit Poll: आजच्या चाणक्य एक्झिट पोलनुसार भाजप १९२ हून अधिक जागांवर पुढे, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पुढील लेख
Show comments