Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आझाद यांना डांबून ठेवणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळपेची असल्याची टीका - जितेंद्र आव्हाड

Webdunia
सोमवार, 31 डिसेंबर 2018 (11:11 IST)
भीम आर्मीचा संस्थापक चंद्रशेखर आझाद यांची मुंबईत सभा रद्द झाली असून, सोबतच पोलिसांनी पुण्यालाही जाऊ देणार नाही हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रशेखऱ आझाद यांना डांबून ठेवणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळपेची असल्याची टीका केली असून,  आव्हाड यांनी चंद्रशेखर आझाद यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या हॉटेल मनालीमध्ये जाऊन त्याची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 
मला वाटतं सरकारने त्याला डांबून ठेवून चूक केलीय, चैत्यभूमीला जाण्यापासून रोखणं हे चुकीचं असून, सरकार अशाप्रकारे विरोधकांचा आवाज दाबू शकणार  नाही. त्यामुळे आता सरकारला यासाठी मोठी किंमत मोजावी लागणार आहे. लोकशाहीची हत्या, विटंबना आहे. त्याला व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य असून ही त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे असे आव्हाड यांनी म्हंटले आहे. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे चंद्रशेखर आझाद यांची २९ डिसेंबर रोजी वरळीच्या जांबोरी मैदानात संध्याकाळी ४ वाजता सभा होणार होती. वरळी पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली होती.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments