Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आरे कारशेडसाठी आता वृक्ष कत्तलींची गरज नाही, फडणवीसांचा दावा

आरे कारशेडसाठी आता वृक्ष कत्तलींची गरज नाही  फडणवीसांचा दावा
Webdunia
सोमवार, 4 जुलै 2022 (07:44 IST)
एकनाथ शिंदेंच्या  बंडानंतर महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं. उद्धव ठाकरे  यांनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला. यांनतर शिंदे यांनी मुख्यमंत्री तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, शिंदे गट आणि भाजपचं सरकार येताच महाविकास आघाडीला धक्के द्यायला सुरुवात केली. फडणवीसांनी आरेतील मेट्रोच्या कारशेडला ग्रीन सिग्नल दिला. सत्तेच्या पहिल्याच दिवशी हा निर्णय घेत उद्धव ठाकरेंना धक्का दिला. आरेतच मेट्रो कारशेड होणार असल्याने पर्यावरणवादी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. तर मेट्रोला विरोध करणे म्हणजे पर्यावरणाला विरोध करण्यासारखं आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
आरेसंदर्भातील विरोध काही प्रमाणात खरा आहे तर, काही प्रमाणात स्पॉन्सर्ड आहे. पर्यावरणवाद्यांचा मी सन्मान करतो. आपलं म्हणणं मांडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतरच तो प्रकल्प सुरू झाला. मेट्रो कारशेडसाठी झाडे कापलेली आहेत. आतापर्यंत २५ टक्के काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे आता पुन्हा झाडे कापण्याची गरज नाही. पुढच्या वर्षभरात काम पूर्ण होऊन मेट्रो सुरू होऊ शकते, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

सर्व पहा

नवीन

छत्रपती संभाजीनगर : १४ वर्षांच्या मुलाचा जीबीएसमुळे मृत्यू, मृतांची संख्या २६ वर पोहोचली

LIVE: १४ वर्षांच्या मुलाचा जीबीएसमुळे मृत्यू, मृतांची संख्या २६ वर

नागपुरात शुक्रवारच्या नमाजासाठी कडेकोट बंदोबस्त

Gold Rate Today : आज सोने किती स्वस्त झाले? दहा ग्रॅमची नवीनतम किंमत जाणून घ्या

जया प्रदा यांना कधीही अटक होऊ शकते? या शहरात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले

पुढील लेख
Show comments