Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी लवकरच होणार ‘हा’ निर्णय

Webdunia
बुधवार, 27 जुलै 2022 (15:39 IST)
राज्यभरातील प्रशासकीय सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. प्रशासकीय अधिकारी पदोन्नती आणि बदल्यांची वाट पाहत होते.आता हा मार्ग मोकळा होण्याचे संख्येत दिसत आहेत याबाबत शिंदे सरकारने भूमिका घेतली असून राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर तसेच पावसाळी अधिवेशनानंतर पोलीस तसंच सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महत्त्वाच्या बदल्या केल्या जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

तत्कालीन ठाकरे सरकारने 30 जून पर्यंत बदल्या करू नये असा शासकीय अध्यादेश काढला होता. मे महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात सर्वत्र पदोन्नती आणि कार्यकाळ संपलेल्या अधिकाऱ्यांच्या नियमानुसार बदल्या आणि प्रमोशन होत असते.परंतु राज्यात राज्यसभा आणि विधान परिषदेची निवडणूक पाहता पक्षांतर्गत आमदारांची नाराजी नको यासाठी एक महिना बदल्यांना मुदत वाढ देण्यात आली होती . दिलेल्या मुदतीआधीच राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळले.

त्यानंतर मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांची वर्णी लागली असली तरी अद्याप पर्यंत मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.त्या मुळे या प्रशासकीय अधिकारी पदोन्नती आणि बदल्यांना विलंब झाला. मंत्रीमंडळ विस्तार रखडल्याने प्रशासकीय सेवेतील अधिकारी बदल्या कधी होणार याची वाट पहात होते .संदर्भात प्रशासकीय अधिकारी संघटनांचे प्रतिनिधी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव यांची भेट घेतली.
या बैठकीनंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार खाते वाटप झाल्यानंतर पावसाळी अधिवेशन होणार असून सर्वसाधारण बदल्या आणि पदोन्नती केल्या जातील असं सांगण्यात आल्याची माहिती सुत्रांकडडून मिळाली आहे. त्यामुळे आता रखडलेल्या बदल्या आणि पदोन्नती साठी वाट पाहत असलेल्या अधिकाऱ्यांना आता मंत्री मंडळ विस्ताराची वाट पहावी लागणार आहे
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments