Dharma Sangrah

अखरेचा प्रवास, तीन जीवलग मित्रांचा मृत्यू

Webdunia
गुरूवार, 3 मार्च 2022 (09:47 IST)
एका भीषण अपघातात तीन जीवलग मित्रांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. आहेर वडगाववरून तीन मित्र बुलेटवर बसून बीडकडे येत असताना त्यांच्यावर काळानं घाला घातला आहे. तिन्ही मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या बसनं बुलेट वरुन जाणाऱ्या तिघांना जोराची धडक दिली. यात दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला तर एका मित्रानं बीडच्या जिल्हा रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. 
 
औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. पारसनाथ रोहिटे (वय २२) कृष्णा भारत शेळके (वय २३) आणि अक्षय सुरेश मुळे (वय २२) हे तीन जण बुलेटवरून बीडकडे जात असताना समोरून येत असलेल्या एसटी बसने दुचाकीस धडक दिली. यात पारसनाथ रोहिटे व कृष्णा शेळके हे जागीच ठार झाले, तर अक्षय मुळे यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना अक्षयचा मृत्यू झाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

आदित्य ठाकरे यांनी २०२६ च्या अर्थसंकल्पावर हल्लाबोल केला, सर्वाधिक कर भरणारे राज्य सर्वात दुर्लक्षित असल्याचे म्हटले

अजित पवारांना राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण हवे होते; संजय राऊत यांनी असा दावा केला

बीडमध्ये लज्जास्पद कृत्य; ९ वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार

LIVE: अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना एकत्र करू इच्छित होते- संजय राऊत यांचा दावा

Bank Holidays in February: फेब्रुवारी महिन्यांत बँका एकूण 9 दिवस बंद राहणार

पुढील लेख
Show comments