Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मालाड येथील दुर्घटनेला जबाबदार कोण? आ. विद्या चव्हाण यांचा सवाल

Webdunia
रात्री झालेल्या मुसळधार पावसात मुंबईतील मालाड भागात भिंत कोसळून सुमारे १८ जण मृत्युमुखी पडले तर कित्येक जण जखमी झाले आहेत. तसेच अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी व्यक्त केली. गेली २० वर्ष हा विभाग पालिकेच्या अखत्यारित येतो. मात्र, झोपड्पट्टीधारकांना कुठल्याच सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. पाणी पुरवठा, वीज, पक्की घरे यापासून येथील झोपडीधारक वंचित असल्याचे विद्या चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.
 
मुंबई महानगरपालिकेने वेळीच नाले, गटारे यांची व्यवस्था केली असती तर आज अशी दुर्दैवी वेळ ओढवली नसती. वन विभाग आणि पालिका यांच्यातच ताळमेळ नसल्याने पावसाळ्याआधी हाती घेतलेली कामे रखडलेल्या अवस्थेत आहेत, असा आरोप त्यांनी केला. पालिकेच्या हलगर्जीपणावर ताशेरे ओढताना विद्या चव्हाण म्हणाल्या की, एकीकडे मुंबईला स्मार्ट सिटी बनविण्याची स्वप्ने दाखवतात आणि दुसरीकडे ६५ लाख झोपड्पट्टीधारक अशा भीषण परिस्थितीत जीव धोक्यात घेऊन राहात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दुर्घटना बाधित झोपड्पट्टीधारकांना घरे उपलबध करून द्यावीत आणि त्यांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे, अशी मागणी विद्या चव्हाण यांनी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

ठाण्यात मृत व्यक्तीविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

ठाण्यात २.२१ लाख रुपयांचा गुटखा जप्त, तर लग्न समारंभात हवेत रिव्हॉल्व्हर चालवल्याबद्दल भाजपा पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

17 february आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी विशेष

कुर्ला परिसरात 5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, दोन अल्पवयीन मुलांना अटक

LIVE: राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही-देवेंद्र फडणवीस

पुढील लेख
Show comments