Festival Posters

एक-दोन अपवाद सोडले तर 40 पैकी एकही जण निवडून येणार नाही - शरद पवार

Webdunia
बुधवार, 13 जुलै 2022 (08:40 IST)
शिवसेनेचे आमदार जरी पक्ष सोडून गेले असले तरी शिवसैनिक तिथेच आहेत, त्यामुळे पुढच्या निवडणुकीमध्ये एक-दोन अपवाद सोडले तर या 40 आमदारांपैकी एकही जण निवडून येणार नाही, असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
 
शिवसेना आणि राष्ट्रवादीची शक्ती एकत्र आल्यास चित्र वेगळं असेल, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
 
"सत्तेत असताना आपल्या सगळ्या मंत्र्यांनी चांगलं काम केल्याचं ठिकठिकाणी ऐकायला मिळतं. प्रदेशाध्यक्षांनी सत्तेत असताना राज्याचा दौरा करुन राज्यभरातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. उपमुख्यमंत्र्यांनी देखील कार्यकर्त्यांना आणि जनतेला वेळ देत राज्याचा कारभार चालविला. अशाच प्रकारे आता विरोधात असतानाही आपल्याला महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे. लोकांचा पक्षावरील विश्वास आणखी वृद्धिंगत करायचा आहे," अशी सूचना शरद पवार यांनी केली.
 
शरद पवार यांनी ओबीसी आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर यांवरही भाष्य केल्याचं  वृत्तात म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका धर्मशाळेत आमनेसामने येतील

ईव्हीएम सुरक्षेवरून वाद निर्माण; स्ट्राँग रूम परिसरात जॅमर बसवण्याच्या मागणीसाठी उमेदवारांचे उपोषण

महायुती विरुद्ध लोकशाही! संजय राऊत यांचा विरोधी पक्षनेत्यावर हल्ला बोल

मनरेगाचे नाव बदलण्यावरून काँग्रेसची टीका अयोग्य: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

LIVE: नाशिकमधील गडकरी चौकातील आयजीपी कार्यालयाच्या आवारात बिबट्या घुसला

पुढील लेख
Show comments