Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Relationship Tips : नातं घट्ट करायचं असेल तर तुमच्या पार्टनरला या 5 गोष्टी म्हणा

Webdunia
शनिवार, 6 मे 2023 (22:52 IST)
Relationship Tips : आपले वडीलधारी नेहमी आपल्याला शिकवतात की कोणीही कोणाशी खोटे बोलू नये. विशेषत: जेव्हा तुमच्या जोडीदाराचा प्रश्न येतो तेव्हा त्यांच्यासोबत जास्तीत जास्त प्रामाणिकपणा दाखवला पाहिजे कारण तुम्हाला तुमचे संपूर्ण आयुष्य तुमच्या जोडीदारासोबत घालवायचे आहे.पण, अनेकदा  जास्त सत्य बोलल्यानेही लोकांचे नाते बिघडते, असे अनेकवेळा दिसून आले आहे. त्यामुळे जर तुम्ही वेळोवेळी खोटे बोलत असाल तर असं करू नका आपली चूक लपवण्यासाठी  खोटे बोलू नये, हे लक्षात ठेवा.वेळोवेळी जोडीदाराशी या  5 गोष्टी  बोलाव्यात जेणे करून  तुमच्या दोघातील नातं अजून घट्ट होईल .चला तर मग जाणून  घेऊ या . 
 
1 भेटवस्तूचे नेहमी कौतुक करा-
तुमच्या जोडीदाराने तुम्हाला गिफ्ट दिले असेल तर त्याचे कौतुक करा. मात्र, तुम्हाला ती भेट अजिबात आवडली नसेल. पण, तरीही समोरच्या व्यक्तीच्या भावनांची कदर करा आणि त्याची स्तुती करा आणि म्हणा की ही तुमच्या आयुष्यातील सर्वात गोड भेट आहे. 
 
2 मनोबल वाढवा-
एक मेकांना सांगा की, तू सगळं व्यवस्थित सांभाळतोस. केवळ ही ओळ तुमच्या जोडीदाराचे मनोबल वाढवू शकते. एखादी व्यक्ती घर आणि ऑफिसची जबाबदारी कशीही सांभाळते. काहीवेळा जास्त कामामुळे ते त्यांचे सर्वोत्तम देऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा स्थितीत तुम्ही खोटे बोलणार्‍याची थोडी स्तुती केली तर समोरच्या व्यक्तीला बरे वाटेल. 
 
3 स्वयंपाकाची प्रशंसा करा
जर तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी प्रेमाने काही तयार केले असेल तर त्यांच्या प्रयत्नाकडे लक्ष द्या. अन्नात काही कमतरता असू शकते. पण जर तुम्ही त्या उणीवाकडे दुर्लक्ष करून जेवणाची स्तुती केली तर तुमच्या जोडीदाराला ते आवडेल. 
 
4 दिसण्याची प्रशंसा करा-
तुमच्या जोडीदाराने नवीन लूक घेतल्यास त्या लुकची प्रशंसा करा
आणि तुम्हाला ते आवडत नसले तरी त्यांची चेष्टा करू नका. तेव्हाच त्याची स्तुती करा. नंतर नंतर हळू हळू प्रेमाने आपले म्हणणे समोर ठेवले तरी चालेल. 
 
 
5 मिस यु असे म्हणा- 
तुम्ही तुमच्या जोडीदाराला नेहमी मिस करत असाल हे अजिबात शक्य नाही. पण, मधेच तुमच्या जोडीदाराला मला तुझी आठवण येते असे म्हणाल तर त्यांना तुमचे प्रेम जाणवेल. असे केल्याने अनेक वेळा मोठे वादही मिटतात. 
 
Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

आंब्यासोबत या पदार्थांचे सेवन केल्यास, शरीरात होईल विष तयार, जाणून घ्या कोणते आहे तीन पदार्थ

पिठात बर्फाचे तुकडे टाका, पोळी बनवण्याची नवीन पद्धत जाणून घ्या

ही सामाजिक कौशल्ये शाळेत जाणाऱ्या मुलांना शिकवा

उन्हाळ्यात टरबूज किंवा खरबूज खाणे काय जास्त फायदेशीर आहे

हेअर डस्टिंग म्हणजे काय? त्याचे 4 सर्वोत्तम फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments