Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात १२ हजार १३४ नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

12 thousand 134 new patients
Webdunia
शनिवार, 10 ऑक्टोबर 2020 (09:06 IST)
राज्यात शुक्रवारी  १७ हजार ३२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत १२ लाख २९ हजार ३३९ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर दिवसभरात १२ हजार १३४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ३०२ मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.६४ टक्के इतका आहे. आतावर पाठवण्यात आलेल्या ७४ लाख ८७ हजार ३८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५ लाख ६ हजार १८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्याच्या घडीला २ लाख ३६ हजार ४९१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
 
सध्या राज्यात २३ लाख ५८८ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर २४ हजार ९७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. सध्या राज्यात २ लाख ३६ हजार ४९१ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आज राज्यात १२ हजार १३४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या १५ लाख ६ हजार १८ इतकी झाली आहे. दरम्यान राज्यात १२ लाख २९ हजार ३३९ रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ८१.६३ इतका झाला आहे.
 
राज्यातील प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या अशी 
 
मुंबई- २६ हजार ७२
ठाणे ३१ हजार ७२१
पुणे ५४ हजार १९५
कोल्हापूर ४ हजार ४९५
नाशिक १४ हजार ४०५
अहमदनगर ९ हजार ६२९
औरंगाबाद ९ हजार ६९५
नांदेड ३ हजार ६२८
नागपूर १० हजार ८९९

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला

मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय, मोदी सरकार करणार जातीय जनगणना

ठाणे: फोन वापरावरून झालेल्या वादातून तरुणीने ११ व्या मजल्यावरून उडी घेत केली आत्महत्या

LIVE: मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना अल्टिमेटम दिला

महाराष्ट्रातील औरंगजेब आणि इतर आक्रमकांच्या कबरी हटवणे हे मुख्यमंत्रीचें पहिले कर्तव्य-द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य

पुढील लेख
Show comments