Dharma Sangrah

महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन कायम राहणार

Webdunia
रविवार, 12 एप्रिल 2020 (09:21 IST)
महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. कोणत्याही उलटसुलट बातम्या येण्याऐवजी मी तुम्हाला ही माहिती देतो आहे. आजपर्यंत जे धैर्य दाखवलंत तसंच यापुढेही दाखवा असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. सगळ्यांनी शिस्त पाळली, धीरोदात्तपणा दाखवला आहे त्याचं कौतुक आहे असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
 
महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे हे तर खरं आहे. पुण्यात सुरुवात झाली, मुंबईत रुग्ण वाढले आहेत. कारण मुंबई हे जगाचं प्रवेशद्वार आहे. आपण तपासण्या सुरु केल्या तेव्हा केंद्राकडून आलेल्या यादीतल्या देशांना बंदी होती. मात्र जे देश यादीत नव्हते त्यातले रुग्ण मिसळले. आता मुंबईत ज्या ज्या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत ते भाग सील केले आहेत. जे रुग्ण आपल्याला सापडलेत त्याची तपासणी महापालिका घरोघरी जाऊन करते आहे. आता समोरुन रुग्ण येण्याची वाट बघत नाही, तर घरी जाऊन चाचण्या करतो आहोत. मुंबईत संख्या १ हजारांवर गेली आहे. ही निश्चितच चिंतेची बाब आहे. मात्र ही आपल्याला फक्त कमी करायची नाही तर शून्यावर आणायची आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

सामान्य लोकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प, नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

पुणे जिल्ह्यातील शिरूर तहसीलमध्ये विहिरीत महिला आणि दोन मुलांचे मृतदेह आढळले

समृद्धी महामार्गावर भीषण रस्ता अपघात; भरधाव कारची कंटेनरला धडक, आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू

'पायलट अचानक बदलले'; कागदपत्रे जळाली नाही पण मृतदेह जळाले; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अजित पवार यांच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

LIVE: अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना एकत्र करू इच्छित होते- संजय राऊत यांचा दावा

पुढील लेख
Show comments