Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र पोलिसांनी तब्बल ४ कोटींचा दंड केला वसूल

Webdunia
मंगळवार, 12 मे 2020 (16:27 IST)
राज्यात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरोधात धडक कारवाई करत महाराष्ट्र पोलिसांनी तब्बल ४ कोटींचा दंड वसूल केला आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन दिली आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी ३ कोटी ९७ लाख ८७ हजार ६४४ रुपयांचा दंड वसूल केला आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. 
 
लॉकडाऊनचे नियम काटेकोरपणे पाळा. गरजेशिवाय घराबाहेर पडू नका, असे वारंवार सांगितले जात आहे. मात्र, अनेकांनी नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर काही ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये १९ हजार ८३८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच ५६ हजार ४७३ वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत, असेही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments