Dharma Sangrah

राज्यात १ हजार ४३७ नव्या रूग्णांची नोंद

Webdunia
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (08:55 IST)
राज्यात रविवारी १ हजार ४३७ इतक्या नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात दिवसभरात ६ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. तसेच आज ३ हजार ३७५ इतके रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत एकूण ७६ लाख ९४ हजार ४३९ इतक्या रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९१ टक्के एवढे झाले आहे.
 
राज्यात शनिवार १ हजार ६३५ इतक्या रूग्णांची नोंद करण्यात आली होती. तसेच २९ जणांचा मृत्यू झाला होता. परंतु आज दिवसभरात कोरोना रूग्णांच्या संख्येत आणि मृत्यूतही घट झाली आहे. राज्यात एकूण १६ हजार ४२२ ॲक्टिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सध्या राज्यात २,०४,९४२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर १०६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,७२,३२,००१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,५८,४३१ (१०.१८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
 
राज्यात एकूण ४ हजार ४५६ इतके ओमिक्रॉनचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ३ हजार ९८६ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. ८ हजार ९०४ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ७ हजार ९९१ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. तसेच ९१३ नमुन्यांचे अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार?

पुणे विमानतळावर इंडिगोच्या 32 उड्डाणे रद्द, शेकडो प्रवासी अडकले

गोंदियातील गौसिया मशिदीने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली

LIVE: उरण मार्गावर अतिरिक्त उपनगरीय रेल्वे सेवांना मंजुरी देण्याची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

केंद्र सरकारने इंडिगो प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले

पुढील लेख
Show comments