Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यातील १.६८ कोटी नागरिकांचा दुसरा डोस अजून बाकी

Webdunia
सोमवार, 4 जुलै 2022 (15:08 IST)
राज्यात कोरोनाचे रूग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. असे असूनही राज्यातील अनेक नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. राज्यातील १.६८ कोटी नागरिकांचा दुसरा डोस अजून बाकी असून हे डोस पूर्ण करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागापुढे मोठे आव्हान आहे.
 
राज्य आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार , राज्यात सध्या लसीकरण बाकी असणाऱ्या १.६८ कोटी नागरिकांमध्ये १.३७ कोटी नागरिकांनी कोव्हिशिल्डचा दुसरा डोस तर ३१.४५ लाख नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा डोस चुकवलेला आहे. तसेच राज्यातील आत्तापर्यंत एकूण ७७.१६ टक्के लोकसंख्येने दोन्ही डोस घेतलेले आहेत.
 
सध्या राज्यातील मुंबईमध्ये १०.६३ लाख रूग्णांनी दुसरा डोस घेतलेला नाही, तर पुण्यातील १५.३९ लाख रूग्णांनी दुसरा डोस घेतलेला नाही. ठाण्यात ९.२७ लाख रूग्णांनी दुसरा डोस घेतलेला नाही. याशिवाय नागपूर, सोलापूर, अहमदनगर , नांदेड, बुलढाणा या जिल्ह्यातील देखील लाखों नागरिकांनी दुसरा डोस चुकवलेला आहे.
 
राज्य आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यात लसीकरणाला येणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे, त्यामुळे लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हापातळीवर ‘हर घर दस्तक’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments